शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांनी नेमले खासगी असिस्टंट

By admin | Updated: November 24, 2014 23:07 IST

वाढत्या बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांच्या मानसिकतेचा फायदा घेत काही शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवर अशा बेरोजगार तरुणांना खासगी असिस्टंट म्हणून नियुक्त केल्याचे दिसत आहे.

अशोक काकडे - पुसद
वाढत्या बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांच्या मानसिकतेचा फायदा घेत काही शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवर अशा बेरोजगार तरुणांना खासगी असिस्टंट म्हणून नियुक्त केल्याचे दिसत आहे. या खासगी व्यक्तींकडून काम करून घेत पगार उचलण्याचा नवा फंडा कर्मचाऱ्यांनी आत्मसात केला आहे. वीज वितरण, ग्रामपंचायत, गुमास्ता कार्यालय, दूरसंचार, सार्वजनिक बांधकाम आदी ठिकाणी असे खासगी असिस्टंट राबताना दिसतात.
शासकीय, निमशासकीय कार्यालय आणि स्वराज्य संस्थांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येकच जण इच्छुक असतो. परंतु सर्वांनाच नोकरी मिळत नाही. त्यामुळे ही मंडळी बेरोजगार असते. अशा बेरोजगारांना काम देण्याचा नवीन ट्रेंड काही शासकीय कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे. आपल्या वाट्याचे काम या असिस्टंटकडून करून घेऊन ही मंडळी मात्र गावभर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. आपल्या बरोबरीच्या शैक्षणिक अर्हतेचा बेरोजगार शोधून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संमतीने सुरू असल्याची माहिती आहे. अत्यंत कमी मोबदल्यात ही मंडळी शासकीय कामकाज त्यांच्यावर सोपवून मोकळे होतात. मात्र यामुळे कागदोपत्री कामांचा घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील काही नगरपरिषदांमध्ये सफाई कामगारांपासून तर कारकुनापर्यंत अनेकांनी हा फंडा वापरणे सुरू केले आहे. सफाई कामगारांनी तर चक्क मजूरच या कामावर नियुक्त केल्याचे दिसून येते. सफाई कर्मचाऱ्यांनी ठेवलेले कामगार योग्यरीतीने काम करतात की नाही यावर देखरेख मुकादमाची असते. परंतु मुकादमानेही असिस्टंट ठेवल्याने सर्व काही आलबेल असते. त्यामुळेच नगरपरिषदेत स्वच्छतेबाबतच्या तक्रारींचा ढिग लागलेला असतो. असाच काहीसा प्रकार वीज वितरण कंपनीतही पहायला मिळतो. ग्रामीण भागात नियुक्त असणाऱ्या लाईनमननी त्या गावातच विजेचे काम जाणणाऱ्या व्यक्तींना असिस्टंट नेमले आहे. त्यांच्याकडून कमी मोबदल्यात कामे करून घेतली जातात. परंतु यात अर्धवट ज्ञान असणाऱ्या गावातील खासगी वायरमनकडून चूक झाल्यास जीव जाण्याची वेळ येते.
दूरसंचार विभागातील कर्मचाऱ्यांनीही असाच फंडा वापरला आहे. दूरसंचारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहे. त्यांच्या हाताखाली अप्रशिक्षित कामगार जनतेच्या तक्रारी हाताळत आहे. त्यामुळे तक्रारीत वाढ होत आहे. ग्रामपंचायतीमध्येही असाच प्रकार दिसून येतो. ग्रामसेवकांनी गावातीलच एखाद्या व्यक्तींवर ग्रामपंचायतीचा कारभार सोपविलेला असतो. त्यातही एकाएका ग्रामसेवकाकडे चार चार ग्रामपंचायतीचा बोजा आहे. त्यामुळे महत्वाचे काम असले तरच जायचे अन्यथा असिस्टंटच्या हाताने कामे करायची अशी पद्धत आहे. अनेक शासकीय कार्यालयातही लिपिक, चपराशी दिसून येतात.
उच्चशिक्षित बेरोजगार अगदी दहावी-बारावी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या हाताखाली अत्यल्प मोबदल्यात राबताना दिसून येतात. नोकरी मिळत नाही. सन्मानाचे काम आहे मग कशाला उच्चशिक्षणाचा बडेजाव करायचा असे म्हणत ही मंडळी निमूटपणे काम करताना दिसतात.