शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या राजकारणात शहर विकास खुंटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 22:55 IST

शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि भाजपाचे बहुमत, त्यातून सुरू असलेली पक्षीय वर्चस्वाची लढाई, या सत्तेच्या राजकारणात यवतमाळ शहराचा विकास खुंटला आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : ग्रामीण क्षेत्रात सर्वाधिक ओरड, सभापती प्रभागातच गुंतले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि भाजपाचे बहुमत, त्यातून सुरू असलेली पक्षीय वर्चस्वाची लढाई, या सत्तेच्या राजकारणात यवतमाळ शहराचा विकास खुंटला आहे. सभापतींना तर आपण पूर्ण शहराचे आहोत, याचा विसर पडला की काय, असे दिसते. कारण ते बहुतांश आपल्या प्रभागातच मर्यादित झाले.यवतमाळ नगरपरिषदेत विकासाचे राजकारण अपेक्षित असताना प्रत्यक्षात विकास बाजूला पडला असून केवळ राजकारण सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शहराच्या हिताचे काहीही होताना दिसत नाही. शहराची अवस्था बकाल झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहे. ठिकठिकाणी कचºयाचे ढिग लागले आहे. नाल्या तुंबल्या आहेत, रस्त्यांची सफाई होताना दिसत नाही. एलईडी मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात अद्यापही ते लागलेले नाही. जुने लाईट बंद आहे तर एलईडी येणार म्हणून जुन्या लाईटचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. ग्रामीण भागात या खुंटलेल्या विकासाबाबत प्रचंड ओरड होताना दिसते आहे. नगराध्यक्षांनी आधी ग्रामीण भागाला निधी द्या म्हणून सभागृहात आग्रही भूमिका मांडली. मात्र भाजपाने बहुमताच्या जोरावर नकार देत सभा उधळली. प्रशासनाच्या खुर्चीतील चेहरा बदलला, मात्र या बदलाचा शहराच्या विकासासाठी कोणताही फायदा होताना दिसत नाही. प्रशासन केवळ सत्तेच्या इशाºयावर कामकाज चालवित असल्याचे स्पष्ट होते. शहराच्या विकासाऐवजी टीबी हॉस्पिटलसाठीच पालिकेचा अधिक ‘इन्टरेस्ट’ असल्याचे पहायला मिळते. कचºयाचे नवे कंत्राट काढण्यात पालिकेला अद्याप यश आलेले नाही. निवडणुकीपूर्वी भाजपाने स्वच्छ व सुंदर आणि स्वप्नातील यवतमाळचा नारा दिला होता. परंतु हे वास्तव कुठे दिसत नाही. प्रत्यक्षात शहराची स्थिती अगदीच विपरित आहे. विकासावर आग्रही राहण्याऐवजी लोकप्रतिनिधी देयकातच धन्यता मानता दिसत आहे. कक्षाच्या भांडणातच लोकप्रतिनिधींचे अनेक महिने निघून गेले.शहराचा विकास खुंटण्यामागे विविध कारणे आहेत. सभापतींनी संपूर्ण शहरावर आपल्या विभागाचे नियंत्रण स्थापित करणे अपेक्षित आहे. त्यांच्या विभागाचे ते जणू ‘मिनी नगराध्यक्ष’ आहेत. परंतु ुकुणी सभापती आपल्या प्रभागातील राजकारणात तर कुणी केवळ सेल्फीत ‘व्यस्त’ दिसतात. काहींनी तर आपला प्रभाग सोडून इतरत्र फारसा जोर दिला नसल्याचे सांगितले जाते. काहींनी तर पालिकेत समाविष्ठ झालेल्या ग्रामीण भागात भेटीही दिलेल्या नसल्याची ओरड ऐकायला मिळते आहे.दारू दुकाने वाचली, रस्ते दुरुस्तीचे काय ?दारू दुकाने वाचविण्यासाठी शहरातील मार्ग नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घेतली. त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही स्वीकारली. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दारूची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू झाली. त्यामुळे आता पालिका रोडचे पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याला हस्तांतरण करणार की स्वत: देखभाल करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण पालिकेकडे जबाबदारी आल्यापासून शहराच्या प्रमुख रस्त्यांची अवस्था वाईट आहे. ठिकठिकाणी खड्डे आहेत. नगर-कॉलण्या व वस्त्यांमधील अंतर्गत रस्त्यांची तर कल्पनाच न केलेली बरी.१६ कोटी पडूनचभाजपाच्या यापूर्वीच्या सत्ताकाळात १६ कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेला प्राप्त झाला होता. त्यातून ओपन स्पेस व अन्य कामे करण्याचे नियोजन होते. मात्र प्रत्यक्षात ही कामे झालीच नाही. पर्यायाने निधी पडून आहे. शहराचा खुंटलेला विकास पाहून तर अनेक नगरसेवक ‘उगाच निवडून आलो’ अशी हतबलता व्यक्त करताना दिसतात कारण कुणाचीच कामे होताना दिसत नाही. तिकडे जनता नगरसेवकांना जाब विचारताना दिसत आहे.पाईपलाईनवरच जोरपिण्याचे पाणी हा यवतमाळकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. बेंबळावरून पाणी आणले जाणार आहे. या प्रकल्पात पाण्याच्या नव्या टाक्या, फिल्टर यावर जोर देणे अपेक्षित असताना आधी पाईपलाईन टाकण्यावर भर दिला जात आहे. रस्त्यांची कामे पुन्हा करावी लागू नये, हे कारण त्यासाठी सत्ताधाºयांकडून पुढे केले जात असले तरी प्रत्यक्षात पाईपची बिले वेगाने निघतात, म्हणून त्याला प्राधान्य दिले जात असल्याचा सूरही पालिकेतूनच ऐकायला मिळतो.