शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
3
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
4
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
5
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
7
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
8
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
9
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
10
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
11
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
12
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
13
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
14
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
15
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
16
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
17
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
18
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
19
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या कोळसा खाणी उठल्या नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 11:34 IST

कोळसा खाणींमुळे या भागात वायू, जल आणि धूळ प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. एका सर्वेक्षणानुसार ज्या भागात कोळसा खाणी आणि प्रदूषणकारी उद्योग आहेत, तेथील ५० टक्के नागरिक श्वसनाशी संबंधित आजार घेऊन जगत आहेत.

ठळक मुद्देप्रदूषणकारी धुराने काळवंडले वणीकरांचे आयुष्यप्रशासकीय अनास्थेचा परिपाक

संतोष कुंडकर

यवतमाळ : कोळसा उद्योगाने व्यापलेल्या वणी परिसरातील नागरिकांचे आयुष्य प्रदूषणकारी धुराने अक्षरश: काळवंडले आहे. धूळ आणि उद्योगांच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजारांशी झुंजावे लागत आहे. मात्र, प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच होणाऱ्या आजारांवरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणाही सक्षम केली जात नाही.

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात उकणी, जुनाड, कोलार पिंपरी, पिंपळगाव, राजूर, कुंभारखणी, भांदेवाडा, घोन्सा, नीलजई, नीलजई क्रमांक २, नायगाव, मुंगोली अशा एकूण १२ कोळसा खाणी आहेत. यापैकी पिंपळगाव, राजूर, कुंभारखणी, नीलजई १ या कोळसा खाणी बंद आहेत. उर्वरित कोळसा खाणींमधून नियमितपणे कोळशाचे उत्खनन सुरू आहे. कोळसा खाणींमुळे या भागात वायू, जल आणि धूळ प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. उन्हाळ्यात वाढत्या तापमानाने खाणीत कोळशाच्या ढिगाऱ्यांना आग लागते. त्यामुळे तेथून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, मिथेन यासारखे मानवी जिवांसाठी घातक वायू उत्सर्जित होतात. त्यातून फुप्फुसाशी संबंधित आजार बळावतो.

एका सर्वेक्षणानुसार ज्या भागात कोळसा खाणी आणि प्रदूषणकारी उद्योग आहेत, तेथील ५० टक्के नागरिक श्वसनाशी संबंधित आजार घेऊन जगत आहेत. वणी भागातही हीच परिस्थिती पाहायला मिळते. लगतच्या राजूर कॉलरी येथील चुनाभट्ट्याच्या धुरांड्यातून निघणारा धूरही नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचवित आहे. धूळ प्रदूषणामुळे पशुपक्षी आपले अधिवास इतरत्र हलवित आहेत.

कोळसा उत्खननासाठी अनियंत्रित ब्लास्टिंग केले जाते. त्यामुळे वन्यजीव घाबरून इतरत्र पळून जात आहेत. कोळसा उद्योगामुळे या भागातून वाहणारी वर्धा नदी अनेक ठिकाणी प्रदूषित झाली आहे. नियम पायदळी तुडवून खाणीतून मातीचे डोंगराएवढे ढिगारे नदीकाठावर उभे केले जात आहेत. त्यामुळेही नदीच्या प्रदूषणात भर पडली आहे.

सीएसआर फंड जातो कुठे?

पर्यावरण व मानवी आरोग्याची हानी रोखण्यासाठी वेकोलिच्या सीएसआर फंडातून उपाययोजना करणे अपेक्षित असते. प्रत्येक कोळसा खाणीला एकूण उत्पन्नापैकी २ टक्के सीएसआर फंडांतर्गत खाण परिसरातील ५ किलोमीटर भागातील उपाययोजनांवर खर्च करावयाचे असतात. परंतु या फंडाचा योग्य विनियोग होताना दिसत नाही.

प्रदूषणामुळे सुमारे १० टक्के मुलांमध्ये बालदमा आढळून येतो, तर ३० टक्के मुलांमध्ये ॲलर्जीसंदर्भातील समस्या दिसून येतात.

- डॉ. सुनील जुमनाके, बालरोगतज्ज्ञ, वणी.

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषण