शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

वेकोलिच्या कोळसा खाणी उठल्या नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 11:34 IST

कोळसा खाणींमुळे या भागात वायू, जल आणि धूळ प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. एका सर्वेक्षणानुसार ज्या भागात कोळसा खाणी आणि प्रदूषणकारी उद्योग आहेत, तेथील ५० टक्के नागरिक श्वसनाशी संबंधित आजार घेऊन जगत आहेत.

ठळक मुद्देप्रदूषणकारी धुराने काळवंडले वणीकरांचे आयुष्यप्रशासकीय अनास्थेचा परिपाक

संतोष कुंडकर

यवतमाळ : कोळसा उद्योगाने व्यापलेल्या वणी परिसरातील नागरिकांचे आयुष्य प्रदूषणकारी धुराने अक्षरश: काळवंडले आहे. धूळ आणि उद्योगांच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजारांशी झुंजावे लागत आहे. मात्र, प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच होणाऱ्या आजारांवरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणाही सक्षम केली जात नाही.

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात उकणी, जुनाड, कोलार पिंपरी, पिंपळगाव, राजूर, कुंभारखणी, भांदेवाडा, घोन्सा, नीलजई, नीलजई क्रमांक २, नायगाव, मुंगोली अशा एकूण १२ कोळसा खाणी आहेत. यापैकी पिंपळगाव, राजूर, कुंभारखणी, नीलजई १ या कोळसा खाणी बंद आहेत. उर्वरित कोळसा खाणींमधून नियमितपणे कोळशाचे उत्खनन सुरू आहे. कोळसा खाणींमुळे या भागात वायू, जल आणि धूळ प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. उन्हाळ्यात वाढत्या तापमानाने खाणीत कोळशाच्या ढिगाऱ्यांना आग लागते. त्यामुळे तेथून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, मिथेन यासारखे मानवी जिवांसाठी घातक वायू उत्सर्जित होतात. त्यातून फुप्फुसाशी संबंधित आजार बळावतो.

एका सर्वेक्षणानुसार ज्या भागात कोळसा खाणी आणि प्रदूषणकारी उद्योग आहेत, तेथील ५० टक्के नागरिक श्वसनाशी संबंधित आजार घेऊन जगत आहेत. वणी भागातही हीच परिस्थिती पाहायला मिळते. लगतच्या राजूर कॉलरी येथील चुनाभट्ट्याच्या धुरांड्यातून निघणारा धूरही नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचवित आहे. धूळ प्रदूषणामुळे पशुपक्षी आपले अधिवास इतरत्र हलवित आहेत.

कोळसा उत्खननासाठी अनियंत्रित ब्लास्टिंग केले जाते. त्यामुळे वन्यजीव घाबरून इतरत्र पळून जात आहेत. कोळसा उद्योगामुळे या भागातून वाहणारी वर्धा नदी अनेक ठिकाणी प्रदूषित झाली आहे. नियम पायदळी तुडवून खाणीतून मातीचे डोंगराएवढे ढिगारे नदीकाठावर उभे केले जात आहेत. त्यामुळेही नदीच्या प्रदूषणात भर पडली आहे.

सीएसआर फंड जातो कुठे?

पर्यावरण व मानवी आरोग्याची हानी रोखण्यासाठी वेकोलिच्या सीएसआर फंडातून उपाययोजना करणे अपेक्षित असते. प्रत्येक कोळसा खाणीला एकूण उत्पन्नापैकी २ टक्के सीएसआर फंडांतर्गत खाण परिसरातील ५ किलोमीटर भागातील उपाययोजनांवर खर्च करावयाचे असतात. परंतु या फंडाचा योग्य विनियोग होताना दिसत नाही.

प्रदूषणामुळे सुमारे १० टक्के मुलांमध्ये बालदमा आढळून येतो, तर ३० टक्के मुलांमध्ये ॲलर्जीसंदर्भातील समस्या दिसून येतात.

- डॉ. सुनील जुमनाके, बालरोगतज्ज्ञ, वणी.

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषण