शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

परसोडा ग्रामपंचायत ठरली तालुक्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:42 IST

आर्णी : तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत तालुक्यात अव्वल ठरली आहे. स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्काराने ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. गावाचा सर्वांगीण ...

आर्णी : तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत तालुक्यात अव्वल ठरली आहे. स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्काराने ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.

गावाचा सर्वांगीण विकास करून गाव सुंदर बनविणे, हे प्रत्येक सरपंचाचे स्वप्न असते. मात्र, प्रयत्न, प्रचंड मेहनत आणि गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय कष्टाला फळ येत नाही. असाच अनुभव तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायतीला आला आहे. माजी सरपंच अतुल देशमुख व विद्यमान सरपंच प्रा. स्वप्ना अतुल देशमुख यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीने अनेक विधायक व नावीन्यपूर्ण कामे केली. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नाव मिळविले.

पूर्वीच्या तालुका स्मार्ट ग्राम योजनेचे नाव दिवंगत आर.आर. पाटील यांनी ‘सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे केले. या योजनेसाठी २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून मूल्यमापन समितीने तालुका सुंदर गावाची निवड केली. त्यात तालुक्यातून परसोडा गावाची निवड करण्यात आली. याब्द्दल सरपंच प्रा. स्वप्ना अतुल देशमुख यांचा गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी सत्कर केला. यावेळी पंचायत समिती सदस्य अनूप जाधव, भारत राठोड, उपसरपंच सुनंदा विनोद पत्रे, सचिव विजय राठोड, माजी सरपंच अतुल देशमुख, दत्ता हुलगुंडे उपस्थित होते.

बॉक्स

विविध योजना राबविल्या

गेल्या पाच वर्षांत परसोडा ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रातील प्रथम लाभार्थी होण्याचा बहुमान पटकाविला. गावकऱ्यांना आरओ प्लांटचे मोफत पाणी दिले. लोकसंख्येच्या दुप्पट वृक्षलागवड केली. प्रशस्त कार्यालय, मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा, व्यायामशाळा, निसर्गरम्य समशानभूमी, महिला बचत गटाकरिता स्वतंत्र कार्यालय आदी उपक्रम राबवून परसोडाने जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. सरपंच प्रा. स्वप्ना देशमुख यांनी हा पुरस्कार तीनदा सरपंच राहिलेल्या दिवंगत प्रकाश देशमुख यांना समर्पित केला.