शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय जोरात सुरू असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध व्यसाय करणारे निर्धास्त आहे. ...
शेतकरी तंत्रज्ञान व बाजारपेठ स्वतंत्र्याशिवाय जगात स्पर्धा करून शकत नाही. आज शासन ‘एचटीबीटी’ बियाण्यावर बंदी आणून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. या बियाण्याला गॅकने (जेनेटीक अपरायझल कमिटी) मान्यता दिली आहे. ...
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी तिरडी यात्रा काढून डफडी बजाओ आंदोलन करण्यात आले. येथील जलाराम मंदिरापासून तहसील कार्यालयावर तिरडी यात्रा काढण्यात आली. यात तिरडीसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. ...
ऐन वेळेवर गोखीचा पर्याय निवडण्याचे काम केले. घिसाडघाईत गोखीचे पाणी शहरात आणताच आले नाही. जवळपास ४२ लाखांच्या पाईपलाईनचा खर्च व्यर्थ ठरला. आता टँकर आणून पाणी वाटप हा परंपरागत उपाय केला जाऊ लागला. ...
तालुक्यातील कोसदनी घाट अपघातासाठी कुप्रसिद्ध. असा एकही आठवडा जात नाही की अपघात झाला नाही. अपघाताची सवय झालेला हा घाट मात्र शुक्रवारी पहाटे १२ जणांच्या मृत्यूने हादरला. सोशल मीडियावरील फोटो पाहून जिल्ह्यातील प्रत्येकाच्या अंगावर काटे उभे राहिले. ...
येथील नगरपालिकेतील एका शासकीय कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या येथील वाघाडी परिसरातील महिलांनी गुरुवारी नगरपरिषदेवर धडक दिली. पाण्याची मागणी लावून धरली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी एवढ्या दूर घर कशाला बांधले असे म्हणत, पाणी प्रश्नावर आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप महिलांनी केला. ...
घरात एक थेंब पाणी नसतानाही यवतमाळकर जनता अतिशय संयम ठेवून सहकार्य करत आहे. काही अपवाद वगळले तर रात्र जागून पाण्याची जमवाजम करण्यात सहकुटुंब व्यस्त असतात. अशा नागरिकांच्या संयमाचा अंत प्रशासकीय यंत्रणा पाहात आहे. ...
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. वाकडे सायंकाळी सेवानिवृत्त होत आहे. त्याच्या काही तासपूर्वी त्यांनी बदल्यांच्या या आदेशावर स्वाक्षरी केली. ...