शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

उमरखेड तालुक्यात साथ रोगाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:40 AM

आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय करून दहशत खालील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या ...

आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय करून दहशत खालील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे जनता भयभीत असताना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, ऊन लागणे, अंगदुखी अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे.

मरसूळ, बेलखेड, पळशी, आमदरी आदी गावांसह अन्य खेडे गावात साथ वाढले आहे. कोरोनाची दहशत खेड्यापाड्यात पोहोचली असताना सर्दी, खोकला, ताप आल्यास तो व्यक्ती कोरोना संशयित म्हणून समजला जातो. त्याला शासकीय कोविड सेंटरला पोहोचविले जाते, असा गैरसमज होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये एकच गर्दी करीत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्रिय करावी, अशी मागणी प्रत्येक गावच्या सरपंच व नागरिकांकडून होत आहे.

बाॅक्स

दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका

कधी जास्त प्रमाणात उन्ह, तर अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे गावागावात पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईन टाकण्यात आल्या आहे. मात्र, ठिकठिकाणी फुटक्या पाईपलाईनमध्ये घाण तयार होते. दूषित पाणी प्राशन केल्याने मळमळणे, ताप, डोकेदुखी आदी आजार वाढत आहे. हा प्रकार खेडे गावात वाढत आहे.