शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

कास्तकारांचे तळे कंत्राटदार घेऊन पळे; विदर्भ, मराठवाड्यातील ३३ लाखांचा निधी गेला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:29 IST

अधिकाऱ्यांनीच बंद पाडली योजना

अविनाश साबापुरे

यवतमाळ : कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या विदर्भ, मराठवाड्यातील शेती सिंचन वाढवून आत्महत्या थांबविण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, कंत्राटदारांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून योजनेचा निधी पळविला. त्यामुळे मंजूर झालेले शेततळे केवळ कागदोपत्री उरल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती बघता, शासनाने कृषी खात्याने ‘उरवलेला’ ३३ लाखांपेक्षा जास्त निधी परत मागवून ही योजनाच बंद केली.

विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागात सिंचनाच्या सोयी नसल्यानेच शेतकरी आत्महत्या वाढविल्याचे वेगवेगळ्या अभ्यास अहवालातून पुढे आले. त्यानंतर छोट्या शेतकऱ्यांना स्वत:च्याच शेतात हंगामी सिंचन करता यावे, यासाठी शेततळ्यांची योजना ९ फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू केली गेली. परंतु योजनेतील ‘मागेल त्याला’ एवढेच शब्द लक्षात ठेवून हुशार कंत्राटदारांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरले आणि अनुदानावरील योजनेचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. त्यामुळे दोन्ही विभागात प्रस्ताव मंजुरीचे प्रमाण भरपूर असले तरी प्रत्यक्षात पाणी साठविलेल्या तळ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत असतानाच शासनाने ही योजनाच बंद करून टाकली. ही परिस्थिती लक्षात घेता पुणे येथील आरटीआय ट्रेनर विशाल ठाकरे यांनी कृषी आयुक्तालयातून माहिती अधिकारात योजनेच्या निधीसंदर्भात माहिती मिळविली.

या अर्जाला उत्तर देताना कृषी आयुक्तालयाने जाहीर केलेली आकडेवारी शेतकऱ्यांनाही बुचकळ्यात पाडणारी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांना २०२१-२२ या वर्षात १७ कोटींपेक्षा अधिक निधी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, त्यातील ३३ लाख ७८ हजारांपेक्षा जास्त निधी शासनाने परत घेतला. आता अलीकडेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन अशा नावाखाली ही योजना पुनर्जीवित करण्यात आली असली तरी ठेकेदारांच्या तावडीतच शेतकऱ्यांचे सिंचन अडकलेले आहे.

जिल्हा - परत गेलेला निधी (लाखात)

  • औरंगाबाद - २.५१०७५
  • बीड - ७.९६९००
  • लातूर - २.४५५५१
  • उस्मानाबाद - ३.०३३५६
  • नांदेड - ०.२३८५६
  • परभणी - ०.४५७३३
  • हिंगोली - ८.११४७१
  • अकोला - १.८८८६३
  • यवतमाळ - ५.१६३१९
  • वर्धा - ०.२७८९०
  • नागपूर - १.४५३८४
  • भंडारा - ०.२२१९३

सहा जिल्ह्यांतील निधी कुठे जिरला

जालना, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये २०२१-२२ या वर्षातील संपूर्ण निधी शेततळ्यांवर खर्च झाल्याची आकडेवारी आयुक्तालयाने माहिती अधिकारात दिली आहे. परंतु या सर्वच जिल्ह्यांमध्ये शेततळे केवळ नावाला उरले आहेत. तेथील निधीचा विनियोग नेमका कसा झाला, असा प्रश्न आरटीआय ट्रेनर विशाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :agricultureशेतीfundsनिधी