शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

आता दलित साहित्यालाच नोबेल पुरस्कार

By admin | Updated: February 28, 2017 01:23 IST

भारतीय साहित्य हे जाती, धर्माच्या बंधनात अडकलेले आहे. दलित साहित्य हे तळागाळातील शेवटचा माणसाचा विचार करणारे, त्यांच्या व्यथा, वेदनेचा हुंकार आहे.

लोकनाथ यशवंत : तळागाळातील माणसाचा विचार करणारे साहित्य यवतमाळ : भारतीय साहित्य हे जाती, धर्माच्या बंधनात अडकलेले आहे. दलित साहित्य हे तळागाळातील शेवटचा माणसाचा विचार करणारे, त्यांच्या व्यथा, वेदनेचा हुंकार आहे. जुन्या रुढी आणि परंपरात अडकलेले हिंदुस्थानी साहित्य भ्रमीत करणारे असल्याने गलितगात्र असणाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे दलित साहित्यच दर्जेदार साहित्य असल्याने यानंतर नोबेल पुरस्कार मिळाला तर तो दलित साहित्यालाच मिळेल, असे मत प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केले. सातव्य आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी येथे आले असता ते प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, काव्य हा परिपूर्ण प्रकार असून छोटी गोष्ट मोठी करून सांगणे त्यामुळे शक्य होते. फॅशन प्रमाणे काव्यातही बदल होत असतात. यातून नक्कल निघून जाते आणि शेवटी दर्जेदार काव्यच काळाची ओघात टिकून राहते. काव्य गेय आहे की मुक्त छंदात आहे या पेक्षा त्याचा दर्जा महत्वाचा ठरतो. कविता वाचल्या बरोबर त्या कवितेत कवीची छाप दिसली पाहिजे, जेणे करुन कवितेच्या खाली कवीला आपले नावसुद्धा लिहिण्याची गरज पडणार नाही. कवी लोकनाथ यशवंत यांचा ‘बाकी सर्व ठिक आहे’ हा काव्य संग्रह एवढ्यातच प्रकाशित झाला आहे. कवीते व्यतिरिक्त आपण कोणत्याही साहित्य प्रकाराकडे वळलो नसल्याचे त्यांनी मान्य केले. आपली प्रकृती आणि प्रवृत्ती काव्यासाठीच पोषक आहे, असे ते म्हणाले. यवतमाळचे प्रसिद्ध कवी एजाज जोश यांच्या ‘जेरबंद’ या काव्य संग्रहाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. याशिवाय निदा फजलींच्या ‘माणूस बेजार इथे आणि तिथे’ या काव्य संग्रहाचा आणि ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘शब्द कभी झुट नही बोलते’ या काव्य संग्रहाचा मराठी अनुवाद केला आहे. अनेकदा माझ्या कवितांवरही आक्षेप घेतले जातात. त्यात नावीन्य नाही, असे आरोप होतात. परंतु मी त्याची पर्वा करीत नाही. आपल्या पद्धतीने जीवन जगताना जे चांगले आहे, त्याच्या मागे जाण्याचा माझा स्वभाव आहे. लहान मुल जसे स्वत:च्या इच्छेप्रमाणे हसते-बागडते, आपल्या पद्धतीने जीवन जगते तसे मुल मी माझ्या मनात जीवंत ठेवले आहे. जिलेबी सारख्या भारतीय साहित्यात माझे मन रमत नाही. यापुढेही मी फक्त स्वत:च्या शैलीतच दर्जेदार काव्य निर्मिती करीत राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)