शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बँक, एटीएमसमोर दुसऱ्या दिवशीही रांगा

By admin | Updated: November 12, 2016 01:38 IST

जिल्ह्यातील बहुतांश एटीएम शुक्रवारी सुरू झाले आहेत. परंतु पैसे काढण्यासाठी नागरिकांनी कालच्या

गर्दी वाढली : अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात व्यवहार, दोन हजारांचे २० कोटींचे चलन बँकांमध्ये दाखल यवतमाळ : जिल्ह्यातील बहुतांश एटीएम शुक्रवारी सुरू झाले आहेत. परंतु पैसे काढण्यासाठी नागरिकांनी कालच्या तुलनेत आज जास्त गर्दी केल्याने एटीएम व बँकांसमोर लांबच लांब रांगा आजही कायम दिसून आल्या. हजार व पाचशेंच्या नोटा बदलून देण्यासाठी तब्बल ५० दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. परंतु व्यवहार करण्यासाठी नागरिकांना होत असलेली अडचण पाहता बँकांमध्ये गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी मोठी गर्दी दिसून आली होती. येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील गर्दी पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या उपाय-योजना करण्यात आल्या होत्या. स्टेट बँकेत नियमित ग्राहकांसोबतच नोटा बदलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. विड्रॉल आणि पैसे जमा करण्यापेक्षा नोटा बदलून घेण्यावर सध्या नागरिकांचा जोर आहे. जेणेकरून छोटे-मोठे व्यवहार अडू नये. शासनाकडून बँकांच्या वेळा वाढवून देण्यात आल्या आहेत, परंतु अनेक खासगी बँकांकडील कॅश संपल्याने त्यांनी दुपारीच काऊंटर बंद करून दिले, त्यामुळे अनेकांना दोन ते तीन तास रांगेत ताटकळत राहल्यानंतरही पैसे मिळू शकले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. काल पहिल्या दिवशी गर्दी असेल या भितीने नागरिकांनी संयम बाळगला, परंतु आज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यातच पेट्रोल पंप, काही रुग्णालये व बाजारपेठेत गुरुवारी काही प्रमाणात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चालल्या. आजा मात्र अशा ठिकाणीसुद्धा चिल्लर नसल्याच्या सबबीखाली हजार पाचशेंच्या नोटा स्वीकारायला कुणीही तयार नव्हते. अनेकांनी या नोटाच स्वीकारा लागू नये म्हणून आपली प्रतिष्ठानेच बंद ठेवली. काही दुकानदार व हॉटेलमध्ये ‘येथे हजार व पाचशेंच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत’ असे फलकच लावण्यात आले, या सर्व बाबींचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. काही लोकांकडे चिल्लर असूनही ते शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून हजार व पाचशेंच्या नोटा स्वीकारत नसल्याचे चित्र यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. शनिवार व रविवारीसुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी बँका सुरू राहणार आहेत. एकंदरीत संपूर्ण परिस्थिती सुरळीत होण्यास दहा ते बारा दिवस लागतील, असे मत काही बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)