शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेस माघारली

By admin | Updated: October 21, 2014 22:59 IST

यवतमाळ शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात शहरासारखीच स्थिती राहिली आहे. पिंपळगाव येथील सात मतदान केंद्रांवर राष्ट्रवादीला अवघी दोन ते चौदा मते मिळाली. अशीच स्थिती मोहा, डोर्ली, वाघापूर,

यवतमाळ : यवतमाळ शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात शहरासारखीच स्थिती राहिली आहे. पिंपळगाव येथील सात मतदान केंद्रांवर राष्ट्रवादीला अवघी दोन ते चौदा मते मिळाली. अशीच स्थिती मोहा, डोर्ली, वाघापूर, लोहारा, भोयर, भोसा, पारवा, भारी या केंद्रांवर राहिली. यवतमाळ शहरातील एकूण १०८ मतदान केंद्रांपैकी कुठेच राष्ट्रवादीला मतांचा तीन अंकी आकडा गाठता आला नाही. चिचबर्डी गावात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक मते मिळविली. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर राहिली. बोथबोडण, तिवसा, किन्ही या गावातही राष्ट्रवादीला सर्वाधिक मते मिळाली. पिंपळगावात शिवसेना व त्यापाठोपाठ भाजपाला मतदारांनी पसंती दिली. अपेक्षेनुसार वाघापुरात शिवसेनेला सर्वाधिक मते मिळाली. डोर्ली, पारवा येथे हत्तीने मजल मारली. लगतच्या गहुली हेटी या गावात मतदारांचा काँग्रेसवर विशेष रोष दिसून आला. तेथे केवळ दहा मते पंजाला मिळाली. यावेळी काँग्रेसला धडा शिकवायचाच, असा निर्धार गहुलीतील बंजारा समाज बांधवांनी निवडणुकीपूर्वीच व्यक्त केला होता. तो त्यांनी खरा करून दाखविला. अकोलाबाजार परिसरात सर्व प्रमुख पक्ष बरोबरीने चालल्याचे दिसून आले. लोणी या गावात शिवसेना आणि भाजपाला सर्वाधिक मते मिळाली. तेथे काँग्रेस तिसऱ्या तर राष्ट्रवादी चौथ्या स्थानावर राहिली. यवतमाळ शहरात बहुतांश भागात शिवसेना आणि भाजपानेच मते घेतली. त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी मायनस ठरले आहे. भाजप नेत्याचे गाव असलेल्या आकपुरी येथे तीनही केंद्रांवर शिवसेनेची आघाडी राहिली आहे. तेथे काँग्रेस दुसऱ्या तर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली. राष्ट्रवादीला तेथे केवळ चार मते मिळाली. गेल्या पाच वर्षांपासून यवतमाळ शहरात सर्वाधिक माहोल राष्ट्रवादी काँग्रेसचाच असताना हा पक्ष प्रत्यक्ष मतदानात एवढा माघारलाच कसा, याचे कोडे राजकीय तज्ज्ञांनाही सुटेलेले नाही. एक तर राष्ट्रवादीकडे दिसणारी गर्दी प्रत्यक्ष मतांमध्ये परावर्तीत करण्यात नेत्यांना अपयश आले असावे किंवा केवळ गर्दी दाखविणाऱ्या या कार्यकर्त्यांची जनमानसात किंमत नसावी, असा तर्क लावला जात आहे. यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेच्या संतोष ढवळे यांनी भाजपाच्या प्रस्थापित उमेदवाराला ५२ हजार ४४४ एवढी प्रचंड मते घेवून जोरदार टक्कर दिली. ढवळेंना समाजातून प्रचंड सहानूभूती मिळाली. ५२ हजारांवरील मते ही ढवळेंच्या कार्याची पावती मानली जात आहे. त्यांचा अवघ्या एक हजार २०० मतांनी झालेला पराभव लक्षात घेता पक्षाचे या मतदारसंघात प्रयत्न कमी पडल्याचे दिसून येते. नियोजन, पैसा, प्रचार सभा, नेत्यांचा संपर्क-पुढाकार, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न या सर्वच बाबतीत दुय्यम ठरूनही ढवळे यांनी ५२ हजार मते घेतआपली समाजकार्याची ताकद पक्षाला दाखवून दिली. (प्रतिनिधी)