शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पदाधिकाऱ्यांपुढे अनेक आव्हाने

By admin | Updated: April 10, 2017 01:57 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांसमोर एकीकडे विविध विकासकामांना गती देण्याचे आव्हान आहे.

विविध प्रश्न तीव्र : राळेगाव परिसरात आरोग्य, शिक्षण, पाणीटंचाईची समस्या के.एस. वर्मा   राळेगावराळेगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांसमोर एकीकडे विविध विकासकामांना गती देण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे वर्षानुवर्षे आरोग्य, शिक्षण, पाणीटंचाईसह विविध महत्वपूर्ण सेवांची पदांच्या कमतरतेमुळे विस्कळीत झालेली घडी सुयोग्यपणे बसविण्याकरिताही प्रयत्नांची कसोटी लागणार आहे. राळेगाव तालुक्यात जून २०१६ पासून पूर्ण वेळ तालुका आरोग्य अधिकारी नाही. मारेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भेरे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. हीच स्थिती कळंब येथील तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या बाबतीतही आहे. मागील चार वर्षांपासून राळेगाव येथे पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नाही. प्रभारावर कामकाज चालविले जात आहे. काही महिन्यांपूर्वी सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. आता मागील महिन्यांपासून पुन्हा विस्तार अधिकाऱ्याकडे हा प्रभार देण्यात आला. राळेगाव सोबतच कळंब व बाभूळगाव तालुक्यातही या पदांबाबत असा खेळखंडोबा गेल्या काही वर्षांपासून सतत चालू राहिला आहे. महिला व बाल विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी पद एक वर्षांपेक्षा अधिक काळापासून रिक्त आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांचा अपवाद वगळता इतर १४ तालुक्यात प्रभरावर कामकाज सुरू आहे. राळेगाव पंचायत समितीमध्ये तीन शाखा अभियंत्यांची गरज असताना मागील एक-दोन वर्षांपासून केवळ एकाच शाखा अभियंत्याच्या भरवशावर निभावून घेतले जात आहे. वरद सर्कलचा प्रभार जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कळंब येथील शाखा अभियंता गणेश शिंगणे यांच्याकडे अतिरिक्त देण्यात आला आहे. ते कळंबवरून परस्परपनेच हा प्रभार पार पडत आहेत. आरोग्य , शिक्षण, महिला व बाल विकास, बांधकाम अभियंते आदी प्रत्येक पद महत्वाचे आहे. प्रत्येक पदाच्या अधिकाऱ्यांना त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे निर्धारित अवधीत पार पाडाव्याच लागतात. या स्थितीत मानहताकडे प्रभार, अतिरिक्त प्रभार आदी बाबींमुळे दोन्ही पदावर अन्याय होतो, त्रुटी राहतात, गैरप्रकारही होऊन जातात. अनेकदा केवळ खानापूर्ती तेव्हढी होते. हे असेच आणखी किती दिवस चालू राहणार याचा विचार करून निर्वाचित पदाधिकारी, संबंधित वरिष्ठ अधिकारी, आमदार, मंत्री आदींनी आवश्यक त्या पदावर पूर्ण वेळ अधिकारी देण्याची नितांत गरज आहे.