शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उजेडाच्या आशेने उजळले चारशे ‘महादीप’, जिल्हा परिषदेचा महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 15:54 IST

मंगळवारी या उपक्रमाची जिल्हास्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर चक्क २० मिनिटांत सोडवून अधिकाऱ्यांनाही चकित केले.

ठळक मुद्देग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा

यवतमाळ : खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांनाही पुढच्या आयुष्यात स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी होता यावे, त्यासाठी बालवयातच त्यांचा सराव व्हावा म्हणून जिल्हा परिषदेने गेले वर्षभर ‘महादीप’ हा उपक्रम शाळांमध्ये राबविला. मंगळवारी या उपक्रमाची जिल्हास्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर चक्क २० मिनिटांत सोडवून अधिकाऱ्यांनाही चकित केले.

अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा घेणारी आणि त्यासाठी वर्षभर विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम पुरवून सतत सराव करून घेणारी यवतमाळ जिल्हा परिषद महाराष्ट्रात एकमेव ठरली आहे. शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सुरुवातीला एकट्या दारव्हा तालुक्यापुरता या संकल्पनेचा जन्म झाला होता. मात्र यावर्षी तो संपूर्ण जिल्ह्यात राबविला गेला. फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील दोन हजारांवर जिल्हा परिषद शाळांमधील चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर परीक्षा घेतली गेली. त्यातून ४१७ विद्यार्थी जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवडले गेले होते. ही जिल्हास्तरीय परीक्षा मंगळवारी येथे पार पडली. यावेळी मराठी माध्यमाचे ३६७ पैकी ३६६ तर, उर्दू माध्यमाचे ५० पैकी ४४ विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. दररोज शिक्षण विभागातून आलेल्या लिंकमुळे स्पर्धा परीक्षेतील अनेक पाठ्यक्रमांचा उत्तम सराव झाल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर एक तासात काहींनी अर्ध्या तासात तर काहींनी चक्क २० मिनिटांत सोडविला.

सकाळी परीक्षा, सायंकाळी निकाल, लगेच विमानवारी

जिल्हास्तरीय परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून शिक्षकांच्या ऐवजी विस्तार अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. तर स्वत: शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर हजर होते. यावेळी पोषण आहार अधीक्षक वंदना नाईक यांच्याकडून सर्व परीक्षार्थ्यांना आहार वाटप करण्यात आला. तर परीक्षा झाल्याबरोबर ४१० ही विद्यार्थ्यांच्या पेपरची तपासणी सुरू करण्यात आली. तर सायंकाळी परीक्षेचा निकालही घोषित करण्यात आला. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसांसोबतच थेट विमानाने दिल्लीवारी घडविली जाणार आहे.

आजवर अनेक परीक्षा पहिल्या, मात्र यावेळचा प्रतिसाद काही वेगळाच होता. विद्यार्थी उत्साहाने पेपर सोडवित होते. परीक्षा केंद्राबाहेर ग्रामीण भागातून आलेले पालकही उत्सुकतेने पूर्णवेळ हजर होते. विशेष म्हणजे गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या अगदीच नगण्य होती.

- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीzpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाexamपरीक्षाTeacherशिक्षक