‘लॉकडाऊन’ने मोडले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:11+5:30

दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही.

‘Lockdown’ breaks the backs of sugarcane growers | ‘लॉकडाऊन’ने मोडले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे

‘लॉकडाऊन’ने मोडले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे

ठळक मुद्देरसवंती बंदचा फटका : पुढीलवर्षी पेरा घटण्याची शक्यता; यंदा लागवड खर्चही निघाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी(रेल्वे) : नजीकच्या दिग्रस शिवारात शेतकरी काळ्या ऊसाची लागवड करून त्याचे उत्पन्न घेतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या संकटाने लॉकडाऊन असल्याने ऊस कापणीकरिता मजूर मिळत नसल्याने तसेच संचारबंदीमुळे बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी हतबल अवस्थेत दिसत आहे.
दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस विक्री योग्य झाला त्यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजुरच मिळाले नाही. ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यातून मजूर बोलविण्यात येत होते. पण, त्यांना देखील आणता आले नाही. शेतकरी ऊस नागपूर ,चंद्रपूर, वर्धा येथील बाजारपेठेत विक्रीकरिता नेत होते. तसेच रसवंतीसाठीही मोठ्याप्रमाणात ऊसाची मागणी असायची. पण, यावर्षी रसवंती सुरू न जाल्याने नाईलाजास्तव ऊस जनावरांना चारावा लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी दिग्रस शिवारात १०० एकरवर ऊसाची लागवड झाली. त्यापैकी ५० एकरातील ऊस डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत विकल्या गेला व उर्वरित ५० एकरातील ऊस हा या विक्री करिता व पुन्हा लागवडीसाठी ठेवला होता. पण, लॉकडाऊनमुळे ऊस विक्री होवू न शकल्याने ऊस शेतातच वाळला. त्यामुळे उत्पन्न हाती येणार नाही.

नुकसान भरपाईची मागणी
ऊसाला उठाव नसल्याने तसेच लॉकडाऊन असल्याने शेतकरी हताश झाले असून नियमित ऊस पीक घेणारे शेतकरी अन्य पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे. ऊसाच्या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकºयांकडून होत आहे.
५० एकर शेतातील पीक वाळले
लॉकडाऊनुमळे बाजारपेठा बंद असल्याने ऊसाला मागणी नसल्याने दिग्रस शिवारातील भुपेश देवतळे, नाना घोडे, आशिष देवतळे, मनोज गवते, मनोहर साठोणे, नामदेव घोडे, राजू देवतळे, दत्तू नखाते, सागर देवतळे, बंडू खडसे आदींसह अनेक शेतकºयांचा ५० एकरातील ऊस शेतातच वाळला असून नाईलाजास्तव त्यांना ऊस जनावरांना चारावा लागत आहे.

Web Title: ‘Lockdown’ breaks the backs of sugarcane growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.