शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

४२ वर्षांपासून नंदपूर धरण अर्धवटच

By admin | Updated: December 11, 2014 23:16 IST

तालुक्यातील किन्ही-नंदपूर येथील धरणाचे बांधकाम गेल्या ४२ वर्षांपासून अर्धवट स्थितीत खितपत पडले आहे. सन १९७२-७३ पासून आत्तापर्यंत ९० टक्के बांधकाम झाले असून केवळ १० टक्के काम अपूर्ण आहे.

पांढरकवडा : तालुक्यातील किन्ही-नंदपूर येथील धरणाचे बांधकाम गेल्या ४२ वर्षांपासून अर्धवट स्थितीत खितपत पडले आहे. सन १९७२-७३ पासून आत्तापर्यंत ९० टक्के बांधकाम झाले असून केवळ १० टक्के काम अपूर्ण आहे.
सन १९७२-७३ मध्ये या धरणाच्या कामाला सुरूवात झाली. त्याला आता ४२ वर्षे लोटली. दरम्यानच्या काळात धरणाचे कसे तरी ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले. मात्र केवळ १० टक्के काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपत आहे. अर्धवट स्थितीतील हे धरण पूर्ण झाल्यास किन्ही-नंदपूर परिसरातील दुष्काळी भागाततील शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ होऊ शकतो. सिंचनाची सुविधा झाल्यास या परिसरातील शेतकरी नगदी बारमाही पिके घेऊ शकतील. त्यामुळे त्यांची आर्थिक बाजू सुधारू शकते.
सध्या या परिसरातील शेतकरी नापिकी व कर्जबाजारामुळे हैराण आहेत. त्यातून शेतकरी आत्महत्या घडत आहेत. हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण पूर्ण होण्याची गरज आहे. त्यातून सिंचनासोबतच व जंगली जनावारांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. मात्र हे धरण वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्यामुळे व वनहक्क कायद्यामुळे वन विभागाचा सतत अडथळा येत आहे.
या धरण क्षेत्रात रोजगार हमी योजनेअंतर्गत कोट्यवधींची कामे आवश्यकता नसताना झाली आहे. त्याऐवजी हे धरण पूर्ण झाले असते, तर शासनाचे कोट्यवधी रूपये वाचले असते. शेतकऱ्यांचा आर्थिक लाभही झाला असता. तथापि राज्य सरकारने या धरणाकडे आजपर्यंत दुलर्क्ष केले आहे.
आता शेतकऱ्यांनी धरणाचे बांधकाम करून शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ द्यावा, अशी मागणी पुढे रेटली आहे. धरण पूर्ण न केल्यास परिसरातील शेतकरी आत्मदहन करतील, असा इशारा किन्ही, घोडदरा, किन्हाळा येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
येत्या अधिवेशन काळात मागणीचा विचार न झाल्यास त्यांनी आत्मदहनाचा मार्ग स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार, आमदारांनाही निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना किसन आदे, श्रीहरी कट्टेवार, अभय कट्टेवार, भास्कर आदे, अशोक सामृतवार, वामन आदे, प्रमोद गोर्लेवार, राकेश नेमनवार, चंद्रशेखर पोलाडीवार, विजय तेलंगे यांच्यासह किन्ही, किन्हाळा, घोडदरा येथील अनेक शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)