शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतामध्ये राबायला गावागावांत मजूरच मिळेना

By admin | Updated: April 20, 2015 00:08 IST

निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी मेटाकुटीस आला असताना आता शेतात राबण्यासाठी मजूरही मिळत नाही.

सालदार बाद : महिन्याने यायलाही कुणी तयार नाहीपुसद : निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी मेटाकुटीस आला असताना आता शेतात राबण्यासाठी मजूरही मिळत नाही. यांत्रिकीकरणाचा उपयोग केला तरी काही खास ठिकाणी मन्युष्यबळाचीच गरज भासते. परंतु आज शेतातील निम्नदर्जाचे काम करायला कुणी तयार नाही. पूर्वी दिसणारे सालदार आता बाद झाले असून महिन्यानेही काम करायला कुणी मिळत नाही. गुढीपाडव्यापासून अक्षयतृतीयेपर्यंत सालदारच मिळाला नसल्याने शेतमालकावर मोठा बाका प्रसंग आला आहे.एक काळ असा होता की शेतकरी आणि शेतमजूर एका नाण्याच्या दोन बाजू होत्या. शेतमजुरांचा उदरनिर्वाह शेतीवर चालत असे. एकाच शेतकऱ्याच्या घरी पिढ्यान्पिढ्या शेतमजुरी केली जात असे. त्यातूनच सालदार ही पद्धत रुढ झाली. वर्षभराचा करार करून ठराविक रक्कम व धान्य सालदाराला दिले जात होते. या बदल्यात सालदार सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत शेतमालक सांगेल ती कामे करीत होता. शेतकरीसुद्धा शेतीकामासाठी सालदाराला घरच्या व्यक्तीप्रमाणे वागवत होता. शिक्षणाचा अभाव, प्रचंड गरिबी यामुळे सालाने राहणे त्या काळी गरजेचे झाले होते. परंतु आता खेडी बदलत चालली आहे. दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहे. शहरे वेगवान वाहनांमुळे जवळ आली आहे. गावागावापर्यंत हॉटेल, ढाबे, पानटपऱ्या पोहोचल्या आहे. त्यामुळे खेड्यातील माणूस आता शेतीतील निम्नदर्जाची कामे करायला तयार नाही. त्यातच शासनाच्या विविध योजनांतून मिळणारे धान्यही यासाठी कारणीभूत ठरत आहे.शेतात सालदार ठेवण्यासाठी आता शेतकरी मजुरांची मिनतवारी करताना दिसतो. सालदारच काय महिन्याने राहायलाही कोणी तयार नाही. सकाळी मिळालेला मजूर सायंकाळपर्यंत कामावर राहीलच याची खात्री नाही. शेतावर काम करण्याऐवजी लगतच्या शहरात जावून प्रचंड कष्टाची कामे करतील. गुढीपाडव्याला सालदार ठेवला जातो. परंतु आता अक्षयतृतीया आली तरी अनेक शेतकऱ्यांकडे सालदारच दिसत नाही. शेतीची अनेक कामे आता यंत्राच्या साहाय्याने केली जात आहे. ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. आजही अनेक कामांसाठी मनुष्यबळाचीच आवश्यकता असते. यासाठी शेतकरी मजुराच्या शोधात असतो. दिवसाला २०० ते २५० रुपये रोज देऊनही शिकलेली पिढी शेतात राबायला तयार नाही. (तालुका प्रतिनिधी)