शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
2
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
3
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
4
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
5
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
6
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
7
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
8
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
9
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
10
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
11
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
12
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
13
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
14
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
15
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
16
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
17
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
18
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
19
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
20
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!

कोलाम पोड्याची 'गावबांधणी', ७२ वर्षांपासून सुरू आहे ही अनोखी प्रथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2022 16:32 IST

अख्खी रात्र नाचतो गाव, पाहुण्यांची होते सरबराई, पोडावर संचारतो उत्साह

जोडमोहा (यवतमाळ) : भारतीय संस्कृतीत विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. विविध धर्मीय नागरिक यानिमित्ताने एकत्रित येतात. जिल्ह्यातील कोलाम बांधवांचीही तब्बल ७२ वर्षांपासून एक प्रथा सुरू आहे. तिला गाव बांधणी म्हणून सर्वत्र ओळखले जाते.

तब्बल ७२ वर्षांपासून जिल्ह्यातील कोलाम बांधव आपल्या गावाची अर्थात पोडांची बांधणी करतात. या पोडांवर बाहेरच्या कोणत्याही शक्तीचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून ही परंपरा पाळली | जाते. यानिमित्त गावाच्या वेशीवर गोल रेषा आखली जाते. चारही दिशांना समाजाचे दैवत मांडले जाते. अख्खी रात्र समाज बांधव पारंपारिक नृत्य व गीतांवर थिरकत असतात.

गाव बांधणीचा कार्यक्रम रात्रभर चालतो. पहिल्या दिवशी रात्री ९ वाजतापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत समाज बांधव गाणी गातात. नृत्य करतात. तत्पूर्वी हिरवा मंडप टाकला जातो. रोषणाई केली जाते. त्यात देवी आई-मायची स्थापना केली जाते. पूजाअर्चा केल्यानंतर रात्रभर सांस्कृतिक कार्यक्रम चालतात. या कार्यक्रमात तरुणाईसुद्धा रात्रभर विविध गाण्यांवर थिरकतात. त्यातूनही परंपरा जोपासली जाते. देवीच्या पूजेत शिविर कोणतेही विघ्न येवू नये म्हणून सर्वच जण काळजी घेतात.

आषाढ पौर्णिमेपर्यंत चालतो कार्यक्रम

दरवर्षी मे आणि जून महिन्यात कोलाम पोडांची बांधणी केली जाते. १९५० पासून हा उपक्रम सुरू असल्याचे प्रौढ बांधव सांगतात. आषाढ पौर्णिमेपर्यंत गाव बांधणीचा कार्यक्रम सुरू असतो.

मांसाहारी जेवणाची बसते पंगत

गाव बांधणीसाठी पाहुण्यांनाही आमंत्रित केले जाते. त्यांची सरबराई केली जाते. बांधणीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवणाची पंगत असते. यात पाहुण्यांची विशेष काळजी घेतली जाते.

बाहेरून कुणी चप्पल घालून आल्यास दंड

कोलाम पोडांमध्ये नाईक हे प्रमुख असतात. उपप्रमुख म्हणून महाजन जबाबदारी पार पाडतात. या दोघांसह गावातील इतर दोन कार्यकर्ते गाव बांधणी करतात. त्यांच्या नेतृत्वात गावाच्या सभोवताल रेषा ओढून बांधणी केली जाते. हेडंबा देवीची मनोभावे पूजाअर्चना केली जाते. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान गावातून कुणीही बाहेर जात नाही आणि बाहेरून कुणी गावात येत नाही. बाहेरून कुणी चप्पल घालून अथवा वाहनाने गावात आल्यास त्यांना दंड ठोठावला जातो. अत्यंत काटेकोरपणे गाव बांधणीचा कार्यक्रम पार पडतो.

गाव बांधणी म्हणजे देवकारण असते. हिरवा मंडप घालून झेंडा रोवला जातो. देवीची पूजा केली जाते. सभोवताल नाचगाणे चालते. ही परंपरा ७५ वर्षांपासून सुरू आहे.

- लक्ष्मणराव लोणकर, जोडमोहा

गाव बांधणी हा आमचा एकप्रकारे सण असतो. देवीच्या श्रद्धेपोटी हा सण साजरा केला जातो. त्यासाठी गावागावांत मे आणि जून महिन्यात बांधणी केली जाते. परगावातूनही बांधव एकत्र येतात.

- मारोती गोधनकर, जोडमोहा

टॅग्स :Socialसामाजिकyavatmal-acयवतमाळ