शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

एमआयडीसीत गुंतवणुकीचे गाजर, उद्योगांची मात्र वाणवाच

By admin | Updated: August 13, 2016 01:20 IST

एकीकडे जिल्ह्यात साडेदहा हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित ११ विशाल प्रकल्पांमध्ये होणार आहे.

सुहास सुपासे  यवतमाळ एकीकडे जिल्ह्यात साडेदहा हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित ११ विशाल प्रकल्पांमध्ये होणार आहे. तर दुसरीकडे सुरू असलेले उद्योग अखेरची घटका मोजत आहे. अशा सर्व उद्योगांना नवसंजिवनी देणे गरजेचे आहे. नवीन उद्योगांसोबतच आहे ते लघुउद्योग कसे टिकतील आणि वाढतील तसेच स्थानिक बेरोजगार उद्योजकतेकडे कसा वळेल यासाठी शासनाचे ठोस कार्यक्रमच नाही, ज्या काही योजना आहेत त्यांची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्ह्यात सध्या यवतमाळ, वणी, पुसद, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, महागाव, कळंब व उमरखेड आदी ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वसाहती आहेत. परंतु यवतमाळ, वणी, उमरखेड व पुसद आदी काही ठिकाणे सोडल्यास इतरत्र मात्र उद्योगांची वाणवा आहे. त्याला कारणही तसेच आहेत. एमआयडीसीमध्ये आवश्यक त्या सोयी-सुविधांचा अभाव आहे. वीज, पाणी, रस्ते, सुरक्षा आदी महत्वाच्या सोयीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही. प्रत्येक ठिकाणी असलेले भूखंड अनेकांनी उद्योगाविना ताब्यात ठेवले आहे. नियमानुसार पाच वर्षात त्या ठिकाणी उद्योग न उभारल्यास एमआयडीसी भूखंड परत घेऊ शकते. परंतु ती प्रक्रियासुद्धा किचकट आणि वेळखाऊ आहे. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात भूखंड परत घेतले आहेत. १५३ भूखंड धारकांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. ६८ भूखंड धारकांना उद्योग संजीवणी योजनेअंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. परत घेतलेल्या भुखंडांचे पुन्हा वितरणसुद्धा सुरू आहे. संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत आहे. परंतु अद्यापही स्थानिक उद्योजक ज्या पद्धतीने तयार व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. माहितीचा अभाव याचे कारण आहे. वसाहती सुरू करून उद्योगाला चालना मिळणार नाही, तर आवश्यक त्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. भविष्यात मोठे प्रकल्प जिल्ह्यात प्रस्तावित असले तरी सध्या मात्र केवळ तीन विशाल प्रकल्प चालू आहेत. यामध्ये रसोया प्रोटीन, डेक्कन शुगर व रेमन्ड युको डेनिम प्रा. लि. चा समावेश आहे. या तीन घटकांमार्फत ७६० कोटींची गुंतवणूक झाली असून २७५० लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात एकूण प्रस्तावित असलेल्या ९१ मोठ्या उद्योगांपैकी २१ मोठे उद्योग उत्पादनात आहे. त्यांच्यामार्फत १४१६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ४१२४ लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यापैकी तीन हजार ५३२ स्थानिक कर्मचारी आहेत. ९१ पैकी उत्पादन सुरू झालेले २१ मोठे उद्योग सोडून उर्वरित ७० पैकी ६७ मोठ्या उद्योगांमध्ये पाच हजार ३२२ कोटी गुंतवणुकीद्वारा १४ हजार १२८ लोकांना रोजगार मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ८७८ सुक्ष्म व लघु उद्योजगांना नोंदणी देण्यात आली असून त्यामध्ये ४६८ कोटी रुपयांची यंत्रसामुग्रीमध्ये गुंतवणूक झाली.