शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

आत्महत्याग्रस्त यवतमाळमध्ये आरोग्य यंत्रणा खिळखिळी; गरीबांचा वाली कोण?

By सुरेंद्र राऊत | Updated: December 9, 2022 14:31 IST

रिक्त पदांचा स्ट्रोक : कणखर प्रशासक नसल्याने गोंधळ

यवतमाळ : आदिवासीबहुल व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात गरिबांना आरोग्य सेवा देणारे एकमेव वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या सुरुवातीला केवळ एमबीबीएसच्या ५० जागा होत्या. नंतर विविध विभागांत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला. आता अतिविशेष उपचार रुग्णालयाची भर पडली आहे. येथे डॉक्टरसह सर्वच संवर्गातील एक हजार ४८४ पदे मंजूर आहेत. मात्र, यातील बहुतांश पदे रिक्त असल्याने रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला स्ट्रोक बसला आहे. येथील कामकाज सध्या व्हेंटिलेटरवर असल्यासारखे सुरू आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वांत मोठा झटका हा पदव्युत्तर अभ्यासक्रमाकाच्या आठ जागा रद्द झाल्याने बसला. मेडिसिन विभागातील या जागा होत्या. या जागांना मान्यता मिळविण्यासाठी दहा वर्षे प्रयत्न करावे लागले होते. अतिविशेष उपचार रुग्णालयाची इमारत बांधून पूर्ण झाली. शासनाने या ठिकाणी २०८ पदांची निर्मिती केली. मात्र, त्यातील केवळ नऊ पदे भरली आहेत. तीही कंत्राटी तत्त्वावर आहेत. यामुळे अतिविशेष उपचार रुग्णालयातील यंत्रसामग्री पाच वर्षांपासून धूळ खात पडून आहे. तिचा उपयोग झालेला नाही. एमआरआय मशीन आता उपलब्ध झाली. मात्र, तंत्रज्ञ नसल्याने तिचा वापर होत नाही. गरीब रुग्णांना सेवा मिळत नाही.

रुग्णालयात २०१० मध्ये बीपीएमपी, बीएसस्सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू झाला. ६३ जागा आहेत. अभ्यासक्रम सुरू होऊन अनेक वर्ष लोटली तरीही यासाठी स्वतंत्र शिक्षक, इतर कर्मचारी नाहीत. शिवाय या विद्यार्थ्यांना हक्काचे वसतिगृहही नाही. वैद्यकीय महाविद्यालयात बीएसस्सी नर्सिंग सुरू करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहे. एमबीबीएस विद्यार्थ्यांची संख्या आता २०० झाली आहे. त्या प्रमाणात येथे होस्टेल उपलब्ध नाही.

महाविद्यालयातील रुग्णांच्या थेट संपर्कात येणारे सर्जरी विभाग, स्त्री रोग विभाग, मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, अस्थी व्यंगोपचार विभाग, नाक-कान-घसा विभाग, नेत्ररोग विभाग, एक्स-रे, सीटी स्कॅन, त्वचारोग, बधिरीकरण, क्षयरोग विभाग, मनोरुग्ण विभाग आहे. येथेही मोठ्या प्रमाणात डॉक्टर, तंत्रज्ञ, नर्सेसची पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. याशिवाय पॅराक्लिनिक असलेला पॅथॉलॉजी, मायक्रो बायोलॉजी, बायोकेमेस्ट्री, फॉरेन्सिक, मेडिसिन हे विभाग आहेत. नॉन क्लिनिकल असणारे ॲनाटॉमी, फिजियालॉजी आणि पीएसएम (कम्युनिटी मेडिसीन) या विभागांचीही अवस्था गंभीर आहे.

रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात घाण

प्रशासक कणखर नसल्याने सर्वांचा मनमानी कारभार सुरू आहे. गरीब रुग्णांना येथे सौजन्याची वागणूक मिळत नाही. अक्षरश: हाकलून देण्याचे प्रकार घडतात. रुग्णालयाची सुरक्षा व स्वच्छताही अतिशय धोकादायक अवस्थेत आली आहे. अतिदक्षता कक्षातच नियमित साफसफाई होत नाही. तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. यावरून इतर वाॅर्डाची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बरी.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलYavatmalयवतमाळ