शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
8
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
9
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
10
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
11
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
12
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
13
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
14
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
15
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
16
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
17
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
18
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
19
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
20
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: December 31, 2016 01:08 IST

नागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे

वरिष्ठांचे दुर्लक्ष : ग्रामीण यंत्रणा ढेपाळली
नेर : नागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना ही सेवा देण्यात चालढकल करत आहे. परिणामी नागरिकांना शहरात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावा लागत आहे. यात त्यांच्या वेळेचा अपव्यय होण्यासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडूनही ही बाब दुर्लक्षित असल्याचे दिसून येते.
प्राथमिक आरोग्य केंद्राला लगतची २५ ते ३० गावे जोडण्यात आलेली आहे. शिवाय उपकेंद्रांना पाच ते दहा गावे जोडली गेली आहे. याठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थानेही बांधण्यात आलेली आहे. आवश्यक त्या सर्व सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परंतु या निवासस्थानांचा वापर काही अधिकारी आणि कर्मचारीच करत आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र ठरलेल्यावेळी उघडले जात नाही. उघडले तरी अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोयीने येतात. रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत असतात. कित्येक तासपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर डॉक्टर दाखल होतात. तेही काही रुग्णांची तपासणी करून निघून जातात. गंभीर रुग्णांना तर या आरोग्यसेवेचा उपयोग फार कमी प्रमाणात होतो. एक तर डॉक्टर उपलब्ध होत नाही आणि झाले तरी तालुक्याच्या ठिकाणी हलविण्याचा सल्ला दिला जातो. साध्या साध्या आजारावरही उपचार करण्याचे टाळले जात असल्याचे प्रकार घडत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना तुसडेपणाची वागणूक दिल्या जात असल्याच्या तक्रारी होतात. संबंधित आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. आवश्यक तेवढे कर्मचारी या विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळेही तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा नागरिकांना पुरविण्यात काही ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)