शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

चार लाख शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि इतर पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांचा विमा उतरविला. यामध्ये पीक विमा उतरविताना शेतकऱ्यांनी पिकांना संरक्षित करण्यासाठी कापसाला पहिले प्राधान्य दिले. त्या खालोखाल सोयाबीन आणि नंतर इतर पीक नाममात्र प्रमाणात संरक्षित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक भर कपाशीवर : तीन लाख हेक्टर संरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे. ३१ जुलैपर्यंत सीएससी केंद्रांमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी तीन लाख हेक्टरवरील पीक संरक्षित केले आहे. बँकांमधील पीक कर्जधारक शेतकऱ्यांनी विमा उतरविला. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्रसिद्ध व्हायचा आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि इतर पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांचा विमा उतरविला. यामध्ये पीक विमा उतरविताना शेतकऱ्यांनी पिकांना संरक्षित करण्यासाठी कापसाला पहिले प्राधान्य दिले. त्या खालोखाल सोयाबीन आणि नंतर इतर पीक नाममात्र प्रमाणात संरक्षित करण्यात आले आहे.याकरिता कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग आहे. जिल्ह्यातील तीन लाख ८८ हजार ३७२ बिगर कर्जदार शेतकºयांनी त्याकरिता पुढाकार घेतला. दोन लाख ७० हजार ५५२ हेक्टरवरील पीक शेतकऱ्यांनी संरक्षित केले. त्याकरिता दोन कोटी ७२ लाख ३२ हजार २९७ रूपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वर्ग केला आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनानेही याकरिता विम्याची काही रक्कम पीक विमा कंपनीकडे जमा केली आहे.मात्र नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई पोहोचती करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. यापूर्वीच्या विम्याचे अनुभव वाईट आल्याने यंदा शेतकरी दक्ष आहेत.कर्जदार शेतकऱ्यांचा आकडा गुलदस्त्यातकर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. मात्र किती शेतकऱ्यांनी विमा उतरविला याचा अहवाल अद्याप बँकांनी प्रसिद्ध केला नाही. येत्या काही दिवसात हा अहवाल प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती