शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

प्राधिकरणापासून हाकेच्या अंतरावर नळाच्या पाण्याची वाहतेय गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 6:00 AM

नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे.

ठळक मुद्देनागरिक पाण्यापासून वंचित । दोन आठवड्यांपासून नळाला थेंबही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्लक्षितपणाची मालिकाच जणू या विभागाने सुरू केली आहे. विविध तांत्रिक कारणे पुढे करून पाणीपुरवठ्यात अनियमितता आणली गेली आहे. आता प्राधिकरणानेच केलेल्या कामामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. बाजोरियानगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील शेकडो नागरिक या प्रश्नाचे बळी पडले आहेत.नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून झाला. मात्र मुख्य पाईपही फुटले असल्याने त्यांचा हा प्रयोगही अयशस्वी ठरत आहे. या भागातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्यासाठी प्राधिकरणाचे पाणी हाच एकमेव स्रोत आहे. नळालाच पाणी नसल्याने त्यांना भटकंती करावी लागत आहे. हातपंप, विहीर आदी स्रोत घराच्या आसपास नाही. पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी प्राधिकरणावर आपला रोष व्यक्त केला. मात्र या विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांची ही समस्या गांभीर्याने घेतली नाही.खोदकाम करत असताना घरगुती पाईपलाईन फुटू नये यासाठी कुठलीही दक्षता घेतली जात नाही. शहराच्या अनेक भागातील नागरिकांना या प्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. विकास कामे करताना नागरिकांची साथ मिळत असली तरी त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विभाग उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामातही असाच प्रकार सुरू आहे. संबंधित अभियंत्यांना सूचना केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा बांध फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अभियंत्यांची टोलवाटोलवीयवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगवेगळ्या परिसरासाठी अभियंत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चापडोह प्रकल्पावरून घेतलेले पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेले अभियंता तर चक्क वॉलमनचे नाव सांगून मोकळे होतात. कुठलीही तक्रार ते गांभीर्याने घेत नाहीत.

टॅग्स :Waterपाणी