शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन उभारी’ तून शेतकरी कुटुंबांना मिळणार बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार योजनांचा लाभ मिळाल्यास उत्पादन वाढण्यास मदत होईल. दोन पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडेल. शेतकऱ्यांचे पाऊल आत्महत्येकडे वळणार नाही यासाठीच प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुकास्तरीय समितीच्या मार्गदर्शनात तणावग्रस्त शेतकरी कुटुंबाला देऊन समूपदेशन केले जाणार आहे.

ठळक मुद्देअभिनव संकल्पना : जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख कायमची पुसून टाकण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अभिनव संकल्पनेतून  ‘मिशन उभारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून नैराश्यग्रस्त शेतकरी  कुटुंबांना बळ दिले जाणार आहे. पूर्णत: शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबात आत्महत्येच्या घटना घडत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा अभ्यास केला असता त्यांना ही बाब दिसून आली. त्यामुळेच ‘मिशन उभारी’ राबविण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चीत केले आहे. या अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देऊन त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाचा आहे. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार योजनांचा लाभ मिळाल्यास उत्पादन वाढण्यास मदत होईल. दोन पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडेल. शेतकऱ्यांचे पाऊल आत्महत्येकडे वळणार नाही यासाठीच प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुकास्तरीय समितीच्या मार्गदर्शनात तणावग्रस्त शेतकरी कुटुंबाला देऊन समूपदेशन केले जाणार आहे. अन्न सुरक्षा योजना, आरोग्य विषयक अडचणी सोडविण्यासाठी शिबीर, संरक्षित जलसिंचन, वीज जोडणी व सौर कृषीपंप योजना, सामूहिक विवाह सोहळे, प्रत्येक गावासाठी अधिकारी व कर्मचारी दत्तक योजना, पशुसंवर्धन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मागेल त्याला कर्ज, लोकसहभागातून विकास, ग्रामस्तरीय बळीराजा समितीच्यावतीने सरपंच व तलाठी यांच्या माध्यमातून महिन्याच्या १ व १५ तारखेला तणावग्रस्त शेतकरी कुटुंबांना योजनांचा लाभ आदी उपक्रम मिशन उभारीअंतर्गत राबविले जाणार आहे. 

गावाेगावी बळीराजा समिती आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती तयार करण्यात आली आहे. याशिवाय गावागावांत बळीराजा समिती गठीत केली जाणार आहे.  तलाठी, तहसीलदार यांना या समितीकडून अहवाल सादर केला जाणार आहे. समितीच्या मार्गदर्शनात तणावग्रस्त शेतकरी कुटुंबाचे समूपदेशन केले जाणार आहे.बळीराजा समितीचे अध्यक्ष सरपंच तर सदस्य सचिव म्हणून पोलीस पाटील काम पाहणार आहे. इतर सदस्यांमध्ये विविध घटकांचा समावेश राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी