शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

अल्प उतारीने शेतकरी चिंतेत

By admin | Updated: October 11, 2015 00:42 IST

यावर्षी शेतीला पावसाने दगा दिल्याने सोयाबीनला अत्यल्प एकरी एक ते दोन पोते उतारी आली आहे. सोयाबीनच्या पिकाची उतारी बघून आता वर्षभर जगावे कसे, ....

सोयाबीन उत्पादक : शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले, सणांवर पडले विरजणमारेगाव : यावर्षी शेतीला पावसाने दगा दिल्याने सोयाबीनला अत्यल्प एकरी एक ते दोन पोते उतारी आली आहे. सोयाबीनच्या पिकाची उतारी बघून आता वर्षभर जगावे कसे, या विचाराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनच्या मिळणाऱ्या उतारीने व कमी भावाने शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकावरचा विश्वासच उडाला आहे.यावर्षी शेती हंगामाच्या सुरूवातीला मृग नक्षत्र चांगले बरसल्याने कापूस व सोयाबीन पिकाच्या पेरण्या साधल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. सोयाबीनचे पीक ऐन शेंगा भरण्याच्या काळात असतानाच पावसाने दगा दिल्याने सोयाबीनचे पीक सुकून गेले आणि शेंगामधील दाणा झिरमीटला. त्यामुळे आता सोयाबीन काढताना एकरी एक ते दोन पोत्याची उतारी मिळत आहे. सोयाबीन पिकाला मिळणारी उतारी बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक नियोजन ढासळून गेले आहे. सोयाबीनच्या कापणीसाठी मजूर एकरी एक हजार ५०० ते एक हजार ६०० रूपये घेतात. यंत्राने सोयाबीन काढासाठी लागणारा खर्च वेगळाच असतो. त्यामुळे सोयाबीनच्या कापणीला व काढणीला लागणारा खर्चही निघत नसल्याने काही शेतकरी उभे पीक पेटवून देत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाच्या उतारीत घट आल्याने आणि पिकाच्या उत्पादनातून भांडवली खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याचा आता सोयाबीन पिकावरचा विश्वासच उडून गेला आहे.पाण्याच्या कमतरतेने सोयाबीनचे पीक करपून गेल्याने पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे सोयाबीनपासून मिळणारे कुटारही यावर्षी अत्यल्प आहे. सोयाबीनच्या कुटाराचा चारा म्हणून शेतकऱ्यांना वर्षभर उपयोग होत होता. परंतु पिकाची वाढ न झाल्याने आणि शेंगा न लागल्याने, आता सोयाबीनपासून कुटारही न मिळाल्यातच जमा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या घरात सणांवरही विरजण पडणार आहे. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)