शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडणारा सर्वंकष सर्वेक्षणाचा जिल्ह्यात प्रयोग

By admin | Updated: February 28, 2015 02:00 IST

शेतकरी कुटंबासमोर अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत नैराश्याने खचलेले कुटुंब प्रमुख आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. आत्महत्येनंतर कुटुंबाला मदत मिळते.

रूपेश उत्तरवार यवतमाळ शेतकरी कुटंबासमोर अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत नैराश्याने खचलेले कुटुंब प्रमुख आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. आत्महत्येनंतर कुटुंबाला मदत मिळते. ही दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाय सुचविले गेले तर दुर्घटना टळेल. हाच उदात्त हेतु डोळ्यापुढे ठेवुन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. महसूल आणि वनविभागाने तसा अद्यादेश काढला आहे. गाव पातळीवर १ मार्च पासून सर्वेक्षण होणार असून शासन दरबारी उपाय योजना सूचविल्या जाणार आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासन दरबारी विविध उपाय सूचविण्यात आले. मात्र त्यानंतरही आत्महत्या थांबल्या नाही. आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबातील अडचणी जाणुन घेण्यासाठी शासन शेतकरी कुटुंबाच्या दारी जाणार आहे. पहिला प्रयोग यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात राबविला जाणार आहे. याबाबत तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यासाठी शासनाचे उपसचिव प्रकाश सुरवशे यांनी अध्यादेश जारी केला आहे. कर्मचारी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबांचा अर्ज भरून घेणार आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबाकडे किती एकर शेत जमीन आहे. त्यांच्या घरातील इतर सदस्य काय काम करतात. त्यांच्याकडे शेतीला पूरक व्यवसाय आहे का, त्यातून त्यांना काही उत्पन्न मिळते का, गुरे, शेळ्या, मेंढ्या, दुधाळ जणावर किती आहेत. कोणत्या बँकेचे किती कर्ज आहे. सावकाराचे कर्ज आहे का, शैक्षणिक कर्ज घेतले आहे का, कुटुंबातील व्यक्तींचा विमा उतरविण्यात आला आहे का, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे या सर्वेक्षणातून शोधली जाणार आहे . त्यावर कोणत्या उपाययोजना करावयाच्या, याबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. यातूनच शेतकरी कुटुंबासमोरील अडचणीचा डोंगर दूर करण्यासाठी उपाय सूचविले जाणार आहे. यामुळे हे सर्वेक्षण एक आदर्श मॉडेल ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून आशेचा किरण गवसणार आहे.