शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:18 IST

मागील तीन-चार वर्षात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : प्रजासत्ताक दिनी विविध पुरस्कारांचे वितरण

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : मागील तीन-चार वर्षात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. रस्ते विकास, सिंचनाच्या योजना, कृषी विकास, आरोग्याच्या सोयीसुविधा आदी महत्वाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.ना.येरावार म्हणाले, न्युईटी धोरणांतर्गत जिल्ह्यातील ३५२ किमी लांबीच्या एकूण सात रस्त्यांसाठी एक हजार ७२ कोटी मंजूर झाले आहे. बेंबळा व अरुणावती प्रकल्पाच्या पुनर्वसित गावठाणांच्या नागरी सुविधांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ८८.४७ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रदूषणापासून मुक्ती आणि अक्षय उर्जेचा स्त्रोत वाढावा या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी सौरउर्जा संच स्थापित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषीपंपाला सौर उर्जेवर कनेक्ट करून शेतकºयाला दिवसा १२ तास वीज देण्यात येईल. पर्यटन विकासात कळंब येथील चिंतामणी देवस्थान, सहस्त्रकुंड, टिपेश्वर, संकटमोचन तलाव, खटेश्वर महाराज देवस्थान, पाथ्रडदेवी संस्थानचा समावेश आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विविध अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी तीन कोटी निधी प्राप्त झाला आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एक हजार ५९९ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यांतर्गत एक हजार ५३९ उमेदवारांची विविध कंपन्यात निवड करण्यात आली आहे, असे ना.येरावार यांनी सांगितले.जिल्ह्यात तीन हजार १०५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. जनतेच्या प्रलंबित कामांना गती यावी, ठराविक कालमर्यादेत जनतेची प्रकरणे निकाली निघावी, यासाठी जिल्हाधिकाºयांनी ‘झिरो पेंडन्सी अ‍ॅन्ड डेली डिस्पोजल’ ही मोहीम हाती घेतली आहे. अतिक्रमण करून बंद झालेले पांदण रस्ते मोकळे करण्यात येत आहे. कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेल्या रेशीम लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकरी पुढाकार घेत आहे. बांबु हे वनविभागाच्या वाहतुकीतून मुक्त करण्यात आले आहे. शेतकºयांनी धुºयावर बांबूची लागवड केली तर पिकांना संरक्षणासोबतच आर्थिक उत्पन्न देखील मिळेल. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करावी, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.संचालन चंद्रबोधी घायवटे, डॉ. ललिता जतकर यांनी केले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.विद्यार्थी, व्यापाºयांचा गौरवआपत्ती निवारण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत प्रथम आलेली अल्विना दुंगे, द्वितीय आकाश काळे, तृतीय क्रमांक पटकाविणारी वृषाली देशमुख, स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरी शौच्छालयाचा आग्रह धरणारी इयत्ता चौथीची श्वेता रंगारी, हागणदारीमुक्तीसाठी पुढाकार घेणारे कान्हापात्रा वाकोडे, चंद्रकला मंत्रीवार, भाऊराव गेडाम, उद्योग क्षेत्रात प्रथम पुरस्कार प्राप्त करणारे जैन इंडस्ट्रीजचे सुनील पारसमल, द्वितीय पुरस्कार मिळविणारे गजानन फर्निचर इंडस्ट्रीजचे गजानन गहुकर यांचा गौरव करण्यात आला.क्रीडा पुरस्काराचे वितरणजिल्हा क्रीडा संघटक संजय कोल्हे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अजय मिरकुटे, गुणवंत खेळाडू संजय राठोड, हेमंत भालेराव, सुप्रिया घुगरे आदींना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.जिल्ह्यातील पोलीस अधिकाºयांचा सत्कारयावेळी राष्ट्रपती पोलीस शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, संग्राम ताठे, उल्हास कुरकुटे यांनी पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे त्यांचासुध्दा सत्कार करण्यात आला.