शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Maharashtra Election 2019 : "नरेंद्र मोदींच्या काळातच देशाची अधोगती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 16:58 IST

नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीत जनतेला विविध आश्वासने दिली.

आर्णी : नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीत जनतेला विविध आश्वासने दिली. मात्र त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांच्या काळात देशाची अधोगती झाल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केला. आर्णी येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशात शेती, उद्योग, सिंचन, रोजगार निर्मिती, आर्थिक बाबी यापैकी कोणत्याही क्षेत्रात भरीव काम झाले नसल्याचा आरोप केला.राज्यात व देशात भाजपने द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. आघाडीच्या नेत्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मोदी यांनी याच तालुक्यात दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ करताना शेती मालाला दीडपट दर देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतक-यांना नफा मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. मात्र यापैकी कोणतेही आश्वासने त्यांनी पाळले नाही, असा आरोप वासनिक यांनी केला. भाजपचे नेते काश्मीर व इतर विषयांवर बोलून वेळ मारून नेत आहे. मात्र राज्याच्या विषयावर ते काहीच बोलत नाही.काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास शेतकºयांना सरसकट कर्जमाफीसोबतच सुशिक्षित बेरोजगारांना दरमाह पाच हजार रुपये मानधन, विद्यार्थ्यांसाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मंचावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आर्णीचे काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, जीवन पाटील, भारत राठोड, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, अ‍ॅड. प्रदीप वानखेडे आदी उपस्थित होते. संचालन आरिज बेग तर आभार छोटू देशमुख यांनी मानले. पवारांवर हात घालून भाजपने महाराष्ट्राची नाचक्की केलीआर्णी पूर्वी मुकुल वासनिक यांनी उमरखेड येथेही सभा घेतली. सभेत बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांनी गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राची सेवा करून देशात राज्याची मान उंचावली. त्याच पवार यांच्या इभ्रतीवर हात घालून भाजप सरकारने राज्याची देशभर नाचक्की केली. तुमच्या सरकारची उपलब्धी काय, असे विचारल्यास आधी तुमचा 60 वर्षांचा हिशेब सांगा, अशी अरेरावीची भाषा वापरून अपयश झाकण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप वासनिक यांनी केला. यासभेला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार प्रकाश देवसरकर, माजी आमदार तथा काँग्रेसचे उमेदवार विजय खडसे, माजी सभापती तातू देशमुख, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर आदी उपस्थित होते.शिवसेनेच्या माजी आमदाराचा काँग्रेस प्रवेशयासभेत शिवसेना नेते, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस हा केवळ पक्ष नसून एक विचार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षच सामान्य जनतेला न्याय देऊ शकतो, असेही देवसरकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019