शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

१८ लाख खर्चूनही वसंतनगर येथील नागरिक तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत आठ लाख रुपये खर्च करून २०१९ मध्ये  विहीर  पूर्ण करण्यात आली. विहिरीवरून १४व्या वित्त आयोगातून १० लाख रुपये खर्च करून वसंतनगर येथे पाइपलाइन टाकण्यात आली. २०२० मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. ग्रामपंचायत कोरोना काळात गृहकर भरल्याशिवाय पाणी देण्यास तयार नाही. ५० टक्के गृहकर व ५०० रुपये अनामत रक्कम भरल्याशिवाय नळ जोडणी होणार नाही.

ठळक मुद्देगृहकर भरल्याशिवाय पाणी नाही

सविता घुगरेलोकमत न्यूज नेटवर्कपोफाळी : मे हिटच्या तडाख्यात उमरखेड तालुक्यातील पोफाळीच्या वसंतनगर परिसरातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सुमारे १८ लाख रुपये खर्च करून पाण्याची व्यवस्था असताना, ग्रामपंचायतीने गृहकर भरल्याशिवाय पाणी मिळणार नसल्याचा फतवा काढल्यामुळे नागरिकांवर पाणी असूनही पाण्याविना तडफडण्याची वेळ ओढावली आहे.२०१७-१८ मध्ये येथील साखर कारखाना बंद पडला आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पाण्याची गरज  पाहून या परिसरात सहा ठिकाणी कूपनलिका घेण्यात आल्या. त्यातील तीनला पाणीच नाही. उर्वरित तीन एप्रिलपर्यंत चालतात, नंतर कोरड्या पडतात. या तिन्ही कूपनलिका एकाच भागात आहेत. त्यामुळे इतर भागात नागरिकांना फायदा होत नाही.महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत आठ लाख रुपये खर्च करून २०१९ मध्ये  विहीर  पूर्ण करण्यात आली. विहिरीवरून १४व्या वित्त आयोगातून १० लाख रुपये खर्च करून वसंतनगर येथे पाइपलाइन टाकण्यात आली. २०२० मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. ग्रामपंचायत कोरोना काळात गृहकर भरल्याशिवाय पाणी देण्यास तयार नाही. ५० टक्के गृहकर व ५०० रुपये अनामत रक्कम भरल्याशिवाय नळ जोडणी होणार नाही.  या परिस्थितीतही ४० जणांनी अनामत रक्कम जमा केली. २० जणांनी गृहकर भरला आहे. अनेक नागरिकांकडे मात्र कराचा भरणा करण्यासाठी पैसे नाहीत.

४० जणांचा पाणीपुरवठा झाला सुरळीतकारखाना कॉलनीतील  ४० जणांनी अनामत रक्कम जमा केली. त्यांना पाणीपुरवठा सुरू झाला. हा परिसर औद्योगिक क्षेत्रात येतो. त्यामुळे नागरिक गृहकर भरत नाही. त्यांचा कर आत्तापर्यंत कारखाना प्रशासन भरत होते. आता त्यांनी केवळ ५०० रुपये अनामत रक्कम जमा करून पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. मात्र, उर्वरित नागरिक पाण्यापासून वंचित आहे.  

वसंतनगर येथील नळ  योजनेसाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीत ५० टक्के गृहकर व  अनामत ५०० रुपये रक्कम भरून  सहकार्य करावे. त्यामुळे गावाचा विकास साधता येईल.- रेखा क्षीरसागर, सरपंच, पोफाळी

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई