शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

१८ लाख खर्चूनही वसंतनगर येथील नागरिक तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत आठ लाख रुपये खर्च करून २०१९ मध्ये  विहीर  पूर्ण करण्यात आली. विहिरीवरून १४व्या वित्त आयोगातून १० लाख रुपये खर्च करून वसंतनगर येथे पाइपलाइन टाकण्यात आली. २०२० मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. ग्रामपंचायत कोरोना काळात गृहकर भरल्याशिवाय पाणी देण्यास तयार नाही. ५० टक्के गृहकर व ५०० रुपये अनामत रक्कम भरल्याशिवाय नळ जोडणी होणार नाही.

ठळक मुद्देगृहकर भरल्याशिवाय पाणी नाही

सविता घुगरेलोकमत न्यूज नेटवर्कपोफाळी : मे हिटच्या तडाख्यात उमरखेड तालुक्यातील पोफाळीच्या वसंतनगर परिसरातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सुमारे १८ लाख रुपये खर्च करून पाण्याची व्यवस्था असताना, ग्रामपंचायतीने गृहकर भरल्याशिवाय पाणी मिळणार नसल्याचा फतवा काढल्यामुळे नागरिकांवर पाणी असूनही पाण्याविना तडफडण्याची वेळ ओढावली आहे.२०१७-१८ मध्ये येथील साखर कारखाना बंद पडला आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पाण्याची गरज  पाहून या परिसरात सहा ठिकाणी कूपनलिका घेण्यात आल्या. त्यातील तीनला पाणीच नाही. उर्वरित तीन एप्रिलपर्यंत चालतात, नंतर कोरड्या पडतात. या तिन्ही कूपनलिका एकाच भागात आहेत. त्यामुळे इतर भागात नागरिकांना फायदा होत नाही.महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत आठ लाख रुपये खर्च करून २०१९ मध्ये  विहीर  पूर्ण करण्यात आली. विहिरीवरून १४व्या वित्त आयोगातून १० लाख रुपये खर्च करून वसंतनगर येथे पाइपलाइन टाकण्यात आली. २०२० मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. ग्रामपंचायत कोरोना काळात गृहकर भरल्याशिवाय पाणी देण्यास तयार नाही. ५० टक्के गृहकर व ५०० रुपये अनामत रक्कम भरल्याशिवाय नळ जोडणी होणार नाही.  या परिस्थितीतही ४० जणांनी अनामत रक्कम जमा केली. २० जणांनी गृहकर भरला आहे. अनेक नागरिकांकडे मात्र कराचा भरणा करण्यासाठी पैसे नाहीत.

४० जणांचा पाणीपुरवठा झाला सुरळीतकारखाना कॉलनीतील  ४० जणांनी अनामत रक्कम जमा केली. त्यांना पाणीपुरवठा सुरू झाला. हा परिसर औद्योगिक क्षेत्रात येतो. त्यामुळे नागरिक गृहकर भरत नाही. त्यांचा कर आत्तापर्यंत कारखाना प्रशासन भरत होते. आता त्यांनी केवळ ५०० रुपये अनामत रक्कम जमा करून पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. मात्र, उर्वरित नागरिक पाण्यापासून वंचित आहे.  

वसंतनगर येथील नळ  योजनेसाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीत ५० टक्के गृहकर व  अनामत ५०० रुपये रक्कम भरून  सहकार्य करावे. त्यामुळे गावाचा विकास साधता येईल.- रेखा क्षीरसागर, सरपंच, पोफाळी

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई