शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदी तीरावरील गावात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: July 20, 2014 00:11 IST

उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी

उमरखेड (कुपटी) : उमरखेड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी आटल्याने तीरावर राहणाऱ्या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी या भागात आलेच नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंब स्थलांतरणाच्या तयारी आहे. हे भयावह चित्र तालुक्यात दिसत आहे. सर्वत्र कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा हाहाकार झाला आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदी तीरावर जवळपास ५० गाव आहेत. या गावांना पावसाळ्यात पुराचा तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा चटका सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे आताही पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पात्रात जेमतेम पाणी होते तेही पूर्णपणे आटले आहे. जून महिना संपून जुलै संपण्याच्या मार्गावर आहे. तरी वरुण राजाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पाऊस आलाच नाही. पावसाचे पाणी नसल्यामुळे नदी आटली. त्यामुळे पाण्याची पातळीही खोल गेली आहे. या भागातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी आटले आहे. याचा परिणाम नदी तिरावरील गावातील पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. अनेक गावातील नळ योजना कुचकामी ठरली आहेत. पैनगंगा नदी तीराबरोबरच इतर गावातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जवळपास ७० गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. प्रशासनाने कृती आराखडा तयार केला. मात्र त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. पण त्यावर कायम उपाययोजना केली जात नाही. तालुक्यातील झाडगाव, तिवरंग, हातला, दिवटपिंप्री, पळशी, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, लोहरा, कारखेड, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, ब्राह्मणगाव, सोईट, ढाणकी, गाजेगाव, सावळेश्वर, अकोली, पिरंजी, करंजी, बिटरगाव, भोजनगर, तरोडा, धनज, धानोरा, हरदडा, वांगी, बिटरगाव, बोथा (वन), चिल्ली या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट झाला आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने जलस्रोत संपुष्टात आले आहे. त्यामुळे नदी तीरावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र रुप धारण करीत आहे. गावकऱ्यांसोबतच वन्य जीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पैनगंगा अभयारण्यात वनविभागाने पाणवठे निर्माण केले. पण त्यामध्ये पाणी नाही. त्यामुळे वन्यजीव गावकुसाकडे चाल करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच याचा परिणाम जवराळा येथील २० वर्षीय युवकावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. (वार्ताहर)