शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बापरे...! उकणी खाणीत शिरले चार वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. सकाळी खाणीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना अनेकदा व्याघ्रदर्शन झाले आहे. त्यामुळे खाणीतील कामगार जीव मुठीत घेऊन खाणीत कामासाठी जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मध्यरात्रीनंतर १ वाजताची वेळ... खाणीतील एक कामगार डम्पर घेऊन पार्किंगकडे निघतो... पार्किंगजवळ पोहोचताच, अचानक एक वाघिण पुढे येते... त्या पाठोपाठ तिचे तीन बछडेही समोर येतात... हे दृश्य पाहताच, डम्पर चालक घाबरून जातो. मात्र, प्रसंगावधान राखून समाेरचे दृश्य आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करतो. ज्या ठिकाणी सदैव कामगारांची वर्दळ असते, अशा उकणी खाणीत गुरुवारी रात्री हा थरार घडला. एकाच वेळी चार वाघांचा वावर पाहून कामगारांमध्ये दहशत पसरली आहे. या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. सकाळी खाणीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना अनेकदा व्याघ्रदर्शन झाले आहे. त्यामुळे खाणीतील कामगार जीव मुठीत घेऊन खाणीत कामासाठी जात आहेत. उकणी खाणीत तीन शिफ्टमध्ये काम चालते. आजवर खाण परिसरात वाघाचा वावर होता. आता एक वाघिण थेट आपल्या बछड्यांसह खाणीत भटकत असल्याने  कामगारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वणी परिसरात दिवसागणीक वाघांचा संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. वणी तालुक्यातील मोहोर्ली, कोरंबी-मारेगाव, विरकुंड, रासा, बोर्डा, घोन्सा, सुकनेगाव, नेरडपुरड, पेटूर या भागांत अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. रासा शेतशिवारात तर दररोजच व्याघ्रदर्शन होत आहे. अद्याप वाघाने मानवावर हल्ले केले नसले, तरी पाळीव जनावरांच्या शिकारीत मोठी वाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वाघांची संख्या वाढल्याने या तालुक्यात मानव-वाघ संघर्ष चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वणी तालुक्यालगत चंद्रपूर जिल्हा आहे. त्यामुळे ताडोबातील वाघ सहजपणे वणी तालुक्यात प्रवेश करतात. या भागातून वाघांचा भ्रमणमार्गही गेला आहे. त्यामुळे वाघांची सातत्याने ये-जा सुरू असते. सोबतच केळापूर तालुक्यातील अभयारण्यही अगदी जवळ आहे. त्यामुळे तेथील वाघही झरी, तसेच वणी तालुक्यात येत आहेत.

झुडूपांमुळे वन्यजिवांसाठी सुरक्षित वातावरण- उकणी खाणीलगत कोलार पिंपरी कोळसा खाण आहे. मात्र, गेले अनेक दिवसांपासून ही खाण बंद आहे. सोबतच या खाणीभोवती झुडपी जंगल आहे. त्यामुळे वन्यजिवांसाठी हा भाग अतिशय सुरक्षित असल्याने या भागात वाघांचा कायम वावर दिसून येतो.

 

टॅग्स :Tigerवाघ