शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना डेथ ऑडिट; 74 टक्के रूग्णांना आधीपासूनच आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

कोरोनाच्या संसर्गाने दुसऱ्या लाटेत १०१६ पैकी ६६७ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर ६५.६४ टक्के इतका आहे, तर ३४९ महिलांचा मृत्यू झाला असून तो दर ३४.३५ टक्के आहे. यावरून महिला घरात राहात असल्याने त्या सुरक्षित असून त्यांचा मृत्यूदरही कमी असल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेत दहा महिन्यांत २६२५ रुग्ण आढळले होते. त्यात केवळ ३६३ जणांचाच मृत्यू झाला. दुसरी लाट ही पाच महिनेच होती. या काळात ५८७२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १०१६ जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देउशिरा दाखल झाल्याने कोरोना हावी : दुसऱ्या लाटेने केली हानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दहशत आजही कायम आहे. अनेकांना या काळात आपला जीव गमवावा लागला. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात या काळात ५८७२ रुग्ण दाखल झाले. यापैकी १०१६ जणांचा मृत्यू झाला. त्यातही पुरुषांचा समावेश सर्वाधिक आहे. किडनी, रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हिपाटायटिस बी यासह इतर आजार असणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाच्या संसर्गाने दुसऱ्या लाटेत १०१६ पैकी ६६७ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर ६५.६४ टक्के इतका आहे, तर ३४९ महिलांचा मृत्यू झाला असून तो दर ३४.३५ टक्के आहे. यावरून महिला घरात राहात असल्याने त्या सुरक्षित असून त्यांचा मृत्यूदरही कमी असल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेत दहा महिन्यांत २६२५ रुग्ण आढळले होते. त्यात केवळ ३६३ जणांचाच मृत्यू झाला. दुसरी लाट ही पाच महिनेच होती. या काळात ५८७२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १०१६ जणांचा मृत्यू झाला. ही स्थिती अतिशय धोकादायक होती. या काळात रुग्णांना बेड मिळणेही मुश्कील झाले होते. शासकीयच नव्हे खासगी आरोग्य यंत्रणाही कोलमडली होती. हा धोका कमी करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

७३ जणांचा ४८ तासांत मृत्यूकोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण होते. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे अवलोकन केल्यास ही लाट किती घातक होती हे दिसून येते. एकूण एक हजार १६ जणांचा दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला. यामध्ये रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत मरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जवळपास ७३ जणांचा रुग्णालयात दाखल होताच मृत्यू झाला. त्यांना बेड न मिळाल्याने प्रकृती खालावत गेली.

सर्वात जास्त रक्तदाबाचे रुग्णकोरोना हा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना सहज ग्रासतो. हे शासकीय कोविड रुग्णालयातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. रक्तदाब हा कोरोना वाढविण्याला पूरक ठरणारा आहे.मधुमेह यामुळेसुद्धा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. मृत्यूमध्ये ९२ जणांना मधुमेह असल्यानेच कोरोना संसर्ग वाढून त्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. रक्तदाब व मधुमेह हे दोन्ही आजार असलेल्या ११७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अशा रुग्णांवर कोरोना उपचारात लवकर प्रतिसाद मिळत नाही. धोका वाढत राहतो.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू