शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

थंडीने भूईमुगाच्या पेरण्या लांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

उन्हाळ्यात प्रामुख्याने भूईमुगाची पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. ओलिताची व्यवस्था असणारे शेतकरी आणि कॅनॉलच्या माध्यमातून ओलित करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. भूईमुगाच्या पेरणीसाठी उष्मांक अधिक असणे गरजेचे आहे. तरच पेरलेले बियाणे व्यवस्थित अंकुरते.

ठळक मुद्देक्षेत्र घटण्याचा धोका : वन्यप्राण्यांमुळे लागवड अडचणीत, शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वातावरणात निर्माण झालेल्या गारठ्याने जिल्ह्यातील भूईमुगाच्या पेरण्या लांबल्या आहेत. यासोबतच जंगली जनावराच्या उद्रेकाने पेरा क्षेत्रात घट होण्याची दाट शक्यता आहे.उन्हाळ्यात प्रामुख्याने भूईमुगाची पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. ओलिताची व्यवस्था असणारे शेतकरी आणि कॅनॉलच्या माध्यमातून ओलित करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. भूईमुगाच्या पेरणीसाठी उष्मांक अधिक असणे गरजेचे आहे. तरच पेरलेले बियाणे व्यवस्थित अंकुरते. यावर्षी वातावरणात अचानक बदल झाला. गारठा मोठ्या प्रमाणात वाढला. हे वातावरण पेरणीस योग्य नाही. यामुळे भूईमुगाची पेरणी पुढे सरकली आहे.कृषीसेवा केंद्रामध्ये भूईमुगाचे बियाणे पोहोचले आहे. मात्र वातावरण ‘सुट’ न झाल्याने पेरण्या पूर्णत: थांबल्या आहेत. यातून विक्रेतेही बुचकळ्यात पडले आहेत. उन्हाचा पारा वाढल्यानंतर पेरणी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वातावरणातील बदलाने पेरण्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. यामुळे भूईमुगाचे उत्पादन प्रभावित होण्याची शक्यता असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडले आहे.रानडुकरांचा मोठा धोकाशेतशिवारात रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्याचे संरक्षण करायचे कसे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रानडुकराच्या वाढत्या त्रासाने उन्हाळी भूईमुगाचे लागवड क्षेत्र घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :agricultureशेती