शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपताना पुलांची तपासणी

By admin | Updated: September 29, 2016 01:11 IST

जिल्ह्यातील पूल, मोऱ्यांची तपासणी करण्याबाबत पावसाळा संपताना ग्राम विकास व जलसंधारण विभागाने पत्र पाठविले.

महाड दुर्घटना : वरातीमागून निघाले घोडे यवतमाळ : जिल्ह्यातील पूल, मोऱ्यांची तपासणी करण्याबाबत पावसाळा संपताना ग्राम विकास व जलसंधारण विभागाने पत्र पाठविले. रायगड जिल्ह्यात महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर वरातीमागून घोडे नाचविण्याचा हा प्रकार घडल्याने यंत्रणेलाही झटका बसला आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मोऱ्या, पुलांचे निरीक्षण विविध स्तरावरील अभियंत्यांनी करावयाचे असते. मात्र २०१३-१४ पासून इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग, रस्ते व पूल दुरूस्ती तथा परीरक्षणाचा कार्यक्रम ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. यात सार्वजनिक बांधकाम, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कामे विभागून दिली.पुलांची देखभाल व दुरूस्ती, तपासणी संदर्भात विविध घटक व प्रतीकूल पर्यावरणामुळे पुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. त्यानुसार पुलांबाबत परीपूर्ण निरीक्षण पद्धती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिपत्रकात विहित केलेल्या पद्धतीनुसार जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाची निरीक्षणे, तपासणी याबाबत कारवाई करण्याबद्दल पावसाळा संपताना ग्राम विकास व जलसंधारण विभागाने नव्याने सूचना दिल्या आहेत.मोऱ्या व पुलांच्या बांधकामाचे निरीक्षणासंदर्भात तांत्रिक स्तरावर विशेष लक्ष पुरविण्याची सूचना देण्यात आली. प्रत्यक्षात बांधकाम संकल्पानुसार मोऱ्या, पूल कार्यरत असल्याची खात्री करावी. अनपेक्षित घटकांमुळे काही बांधकामांना क्षती पोहोण्याची शक्यता असल्याने नित्य नेमाने मोऱ्या, पुलांचे निरीक्षण, देखभाल व दुरूस्तीची सूचनाही देण्यात आली. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांनी पावसाळ्यापूर्वी व पावासाळ्यानंतर पुलांचे निरीक्षण करावयाचे असते. त्यानुसार त्यांनी आवश्यक त्या तपासणी सूची व निरीक्षण प्रपत्रे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुलांचे निरीक्षण, तपासणी करून या सर्व बाबी निरीक्षण नोंदवहीत नोंदविण्याचे निर्देश आहे. अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांनी त्यांच्या स्तरावर निरीक्षण करणे, नोंदवहीची तपासणी करणे आवश्यक आहे. गरज पडल्यास दोष दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळाची मदत घेता येणार आहे. (शहर प्रतिनिधी)पावसाळ्यानंतर सूचनांच्या अंमलबजावणीचे निर्देशग्राम विकास व जलसंधारण विभागाने केलेल्या या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सहसचिव दि. ग. मोरे यांनी दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनीच आपल्या स्वाक्षरीनिशी निर्गमित केलेल्या पत्रात यावेळी पावसाळा सुरू झाला असला, तरी पावसाळ्यापूर्वी करावयाची तपासणी, निरीक्षणे आता लगेच करण्याचे निर्देश दिले आहेत. निरीक्षणे, तपासणी, दुरूस्तीचे हे पत्र गेल्या २ आॅगस्टच्या मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील महाडजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर ८ आॅगस्टला निर्गमित करण्यात आले आहे.