शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीसीएफपुढे तस्करांचे आव्हान

By admin | Updated: January 17, 2017 01:19 IST

येथील नवे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण यांच्यापुढे सागवानाची अवैध तोड, तस्करी आणि दुर्र्मीळ वन्यजीवांची शिकार रोखण्याचे आव्हान राहणार आहे.

दुुर्मिळ वन्यजीवांची शिकार : अवैध तोडीमुळे जंगल होतेय साफ यवतमाळ : येथील नवे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण यांच्यापुढे सागवानाची अवैध तोड, तस्करी आणि दुर्र्मीळ वन्यजीवांची शिकार रोखण्याचे आव्हान राहणार आहे. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक व्ही. व्ही. गुरमे यांची नागपूर मुख्यालयी बदली झाली. त्यांची जागा आता नागपूर येथील कार्यआयोजनाचे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण घेणार आहे. यवतमाळच्या कार्यआयोजना उपवनसंरक्षकाची जागा गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त होती. ही जागासुद्धा आता भरण्यात आली असून तेथे नवीन सिंग यांना नियुक्ती देण्यात आली. व्ही. व्ही. गुरमे सुमारे तीन वर्षांपासून यवतमाळचे सीसीएफ होते. त्यांचे कार्यक्षेत्र वाशिम, अकाल्यापर्यंत होते. त्यांच्या कार्यकाळात सागवान तोड नियंत्रणात येऊ शकली नाही. आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. पैशाची भुरळ पडलेल्या वन खात्यातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना फितूर करून तस्कर जंगल साफ करीत आहे.महाराष्ट्र-आंध्रसीमेवर पिंपळखुटी चेक पोस्टवर पकडल्या गेलेल्या अवैध सागवानाच्या ट्रकने ही बाब सिद्ध केली आहे. सागवान तस्करीतून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. त्या बळावरच वन अधिकाऱ्यांकडून हिवरी, जोडमोहा, सावळीसदोबा, पारवा, घाटंजी यासारखे ‘हेवी रेंज’ मिळविण्यासाठी रस्सीखेच चालते. अनेकदा त्यासाठी ‘रॉयल्टी’चे राजमार्गही स्वीकारले जातात. नंतर याच राजमार्गावरुन तस्कर व शिकाऱ्यांना साथ देऊन कितीतरी पटीने ‘अर्थ’कारणात भर घातली जाते. चिंकारा हरणासारख्या दुर्र्मीळ वन्यजीवांची खुलेआम कत्तल करून त्याचे मांस हैदराबादपर्यंत वातानुकूलित वाहनातून पोहोचविले जात असल्याची बाब यापूर्वीच वन खात्याच्या रेकॉर्डवर नोंदविली गेली. कोणत्याही रोडने यवतमाळात वरवर सागवानाची घनदाट झाडी दिसत असली, तरी प्रत्यक्षात काही मीटर आत गेल्यास जंगलाचे चक्क मैदान झाल्याचे चित्र पहायला मिळते. यवतमाळच्या कार्यआयोजना उपवनसंरक्षपदी नियुक्ती झालेल्या नवीन सिंग यांच्याकडूनही स्थानिक जनतेला अनेक अपेक्षा आहे. गेली कित्येक महिने हे पद रिक्त होते. यवतमाळच्या जंगलांमध्ये अनेक परिपक्व झाडे आहेत. त्याची तोड नित्यनेमाने केली जाते. परंतु त्याआड अपरिपक्व झाडांचीसुद्धा सर्रास कत्तल होते. मंजुरी दहा झाडांची आणि तोड हजार झाडांची, असे आतापर्यंतचे चित्र आहे. हे चित्र बदलविण्याची पर्यायाने जंगल संरक्षणाची जबाबदारी आता नवीन सिंग यांच्यावर आली आहे. चव्हाण व सिंग यांच्या कार्यकाळात अवैध वृक्षतोड, सागवान तस्करी आणि वन्यजीवांच्या शिकारीला लगाम बसेल, अशी रास्त अपेक्षा जिल्ह्यातील जनतेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)फितूरांचा शोध घ्यायवतमाळचे मुख्य वनसंरक्षक म्हणून जबाबदारी सोपविलेल्या जी. टी. चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील वन्यप्रेमी व नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहे. त्यांनी प्रथम तस्करांशी हातमिळविणी करणाऱ्या आपल्याच खात्यातील ‘लखोबां’चा शोध घ्यावा, अशी जनतेची मागणी आहे. त्याशिवाय सागवान तस्करांवर नियंत्रण मिळविणे कठीण असल्याचा वनवर्तुळातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांमधील सूर आहे.