शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

कळंब बाजार समितीच्या सक्षमतेचे संचालकांपुढे आव्हान

By admin | Updated: November 11, 2016 02:14 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु यापूर्वी बाजार समितीने शेतकऱ्यांऐवजी व्यापाराचे हीत जोपासले.

पूर्वी होते व्यापाऱ्यांचेच हित : पाच वर्षांत उत्पन्नात मोठी घसरणकळंब : शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु यापूर्वी बाजार समितीने शेतकऱ्यांऐवजी व्यापाराचे हीत जोपासले. त्यामुळे बाजार समिती डबघाईस आली. आता समितीला सक्षम करण्याचे मोठे आव्हान नवीन संचालक मंडळापुढे उभे ठाकले आहे. मागील पाच वर्षामध्ये बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली. पूर्वी व्यापारी मंडळी खासगीमध्ये परस्पर शेतमाल खरेदी करायचे. परिणामी बाजार समितीचा सेस बुडविला जायचा. मागील वर्षी १९ ते २० हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच १८ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीचा उच्चांक गाठला. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केली जात आहे. यावरुन खासगी शेतमाल खरेदीत प्रामाणिकपणे अटकाव केल्याचे दिसून येते. असे असले तरी बाजार समितीला उतरती कळा थोपवून त्यात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. दोन डझनापेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी नोंद आहे. परंतु हर्रासवर केवळ दोन ते चारच व्यापारी बोलीसाठी हजर असतात. हर्रासावरील व्यापाऱ्यांची संख्या वाढविल्यास याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. मागील पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करीत केवळ बांधकाम व कर्मचारी भरतीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी असलेला शिदोरी मंडप अजूनही नावापुरताच आहे. तेथेही सुविधा निर्माण कराव्या लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)