शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

जातीव्यवस्था माणुसकीला नख लावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

जातीभेद अमान्य करणाऱ्यांची कानउघाडणी करताना राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचा दाखला देऊन अशोक बुरबुरे म्हणाले, जातिभेद नाकबुल करणारे विशिष्ट वर्गाचे नेते निवडणूक निकालानंतर मात्र उघडपणे आमच्या नेत्यांना महासामंतांनी पराभूत करून नामशेष करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली देतात. यामध्येच जातिभेद आहे किंवा नाही? या प्रश्नाचे रहस्यमयी उत्तर दडलेले आहे.

ठळक मुद्देअशोक बुरबुरे : आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या संयोजनात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जातीव्यवस्था ही माणुसकीला नख लावते आणि माणसाला माणसातून वजा करते. जोपर्यंत ती समूळ नष्ट होणार नाही तोपर्यंत जाती निर्मूलनाचे काम सुरूच ठेवावे लागेल. सर्वप्रथम विषमतेला छेद देण्यासाठी अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने जगाला दिलेल्या समताधिष्ठित विचारमूल्यांची पेरणी सातत्याने करीत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व कवी, कलावंत अशोक बुरबुरे यांनी केले.येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या संयोजनातील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘जातीचे निर्मूलन : बौद्ध समाज निर्मिती : शोध आणि बोध’ या विषयाला अनुसरून त्यांनी मार्गदर्शन केले.जातीभेद अमान्य करणाऱ्यांची कानउघाडणी करताना राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचा दाखला देऊन अशोक बुरबुरे म्हणाले, जातिभेद नाकबुल करणारे विशिष्ट वर्गाचे नेते निवडणूक निकालानंतर मात्र उघडपणे आमच्या नेत्यांना महासामंतांनी पराभूत करून नामशेष करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली देतात. यामध्येच जातिभेद आहे किंवा नाही? या प्रश्नाचे रहस्यमयी उत्तर दडलेले आहे.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुण जनबंधू होते. प्रमुख पाहुणे डॉ. विवेक गुजर, डॉ. महेंद्र पखाले, डॉ. श्रीकांत मेश्राम, अजय गौरकार, इंजी. घनश्याम भारशंकर, इंजी. भीमराव गायकवाड, इंजी. संजय मानकर, अकादमीचे अध्यक्ष गोपिचंद कांबळे, सचिव आनंद गायकवाड, स्मृति पर्व व आयोजन समितीचे ज्ञानेश्वरराव गोरे, विलास काळे यांची उपस्थिती होती.समारोपीय सत्राच्या प्रारंभी येथील सुप्रसिद्ध गायक कलावंत घनश्याम पाटील आणि संचाने भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे निवेदन कवी विनय मिरासे यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका प्रा. संदीप नगराळे यांनी मांडली. प्रास्ताविक अकादमीचे प्राध्यापक विलास भवरे यांनी केले. आनंद गायकवाड यांच्या बीज भाषणानंतर नीरज वाघमारे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. कवडू नगराळे व सुनील वासनिक यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. नीलेश सोनटक्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आंबेडकरी साहित्य कला अकादमीचे डॉ.प्रा. युवराज मानकर, डॉ. सुभाष जमदाडे, डॉ. साहेबराव कदम, सुमेध ठमके, आनंद धवणे आदींनी पुढाकार घेतला.