शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

क्विंटलने खरेदी, किलोने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:15 IST

शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान्य ग्राहकसुद्धा लुटला जातो आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव : ग्राहकांना मात्र चौपट दर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान्य ग्राहकसुद्धा लुटला जातो आहे. व्यापाऱ्यांच्या या दरावर एक तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेच नियंत्रण नसावे अथवा वैयक्तिक लाभापोटी बाजार समितीचे कर्तेधर्ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असावे, असे दिसते.यवतमाळच्या बाजारात वांग्याचे ठोक दर ५० ते १०० रूपये कट्टा आहेत. एका कट्ट्यात ३० ते ४० किलो वांगे बसतात. यानुसार शेतकऱ्यांना एक ते सव्वा रूपये किलो वांगे पडत आहेत. बाजारातला हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. अशीच अवस्था कोबीची आहे. कोबीच्या एका कट्ट्यात ६० ते ७० किलोचे नग बसतात. त्याचा दर १५० ते २०० रूपयांपर्यंत आहे. दर आणि असलेले वजन यानुसार कोबीला किलोमागे केवळ २ रूपयांचा दर पडत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोबी आणि वांग्यांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, दर मिळत नसल्याने कोबी आणि वांगे उत्पादक शेतकºयांना फटका बसला आहे.व्यापाऱ्यांच्या नफेखोरीने शेतकरी नाडलावांगे आणि कोबी स्वस्त असली तरी भाजीपाला विक्रेते सर्वसामान्य ग्राहकांना १० ते २० रूपये किलो दरानेच वांगे आणि कोबी विकत आहे. एका किलोवर नऊ पट नफा मिळविला जात आहे. ज्या शेतकºयांमुळे व्यापाºयांना रोजी मिळते, त्या शेतकऱ्यांना पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे भविष्यात भाजीपाला उत्पादकांसाठी धोक्याची घंटा मिळाली आहे.शासकीय यंत्रणा अपयशीबियाणे, लागवड, खत आणि फवारणीसह भाजीपाला तोडणीचा खर्च मोठा आहे. यानंतरही शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दरात खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांच्या या लुटीला आळा घालण्यात शासकीय यंत्रणा मात्र असमर्थ ठरली आहे.क्लस्टर गेले कुठे?शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवहार घडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून बाजारपेठ उभारण्यात आली. आठ दिवसात ही बाजारपेठ बंद पडली. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि गार्डन रोडवरील नर्सरीतील हे केंद्र आता नावालाच उरले आहे.बाजारात शेतमालाला संरक्षण नाही. व्यापारी वाट्टेल त्या दरात शेतमालाची खरेदी करत आहे. यामुळे वांगे घेऊन येणाऱ्या वाहनाचे भाडेही निघणे अवघड झाले आहे.- प्रमोद शेंदूरकर,तरोडा, ता. दारव्हाव्यापार करताना व्यापारी प्रत्येक खर्च वसूल करतो. मात्र शेतकरी कधी तसा विचार करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. यावर निर्बंध लावण्यासाठी ठोस उपाययोजना असाव्या.- सुनील राठोड, तिवसा

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी