शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
3
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
4
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
5
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
6
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
7
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
8
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
9
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
10
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
11
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
12
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
13
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
14
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
15
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
16
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
17
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
19
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
20
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

क्विंटलने खरेदी, किलोने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:15 IST

शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान्य ग्राहकसुद्धा लुटला जातो आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव : ग्राहकांना मात्र चौपट दर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान्य ग्राहकसुद्धा लुटला जातो आहे. व्यापाऱ्यांच्या या दरावर एक तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेच नियंत्रण नसावे अथवा वैयक्तिक लाभापोटी बाजार समितीचे कर्तेधर्ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असावे, असे दिसते.यवतमाळच्या बाजारात वांग्याचे ठोक दर ५० ते १०० रूपये कट्टा आहेत. एका कट्ट्यात ३० ते ४० किलो वांगे बसतात. यानुसार शेतकऱ्यांना एक ते सव्वा रूपये किलो वांगे पडत आहेत. बाजारातला हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. अशीच अवस्था कोबीची आहे. कोबीच्या एका कट्ट्यात ६० ते ७० किलोचे नग बसतात. त्याचा दर १५० ते २०० रूपयांपर्यंत आहे. दर आणि असलेले वजन यानुसार कोबीला किलोमागे केवळ २ रूपयांचा दर पडत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोबी आणि वांग्यांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, दर मिळत नसल्याने कोबी आणि वांगे उत्पादक शेतकºयांना फटका बसला आहे.व्यापाऱ्यांच्या नफेखोरीने शेतकरी नाडलावांगे आणि कोबी स्वस्त असली तरी भाजीपाला विक्रेते सर्वसामान्य ग्राहकांना १० ते २० रूपये किलो दरानेच वांगे आणि कोबी विकत आहे. एका किलोवर नऊ पट नफा मिळविला जात आहे. ज्या शेतकºयांमुळे व्यापाºयांना रोजी मिळते, त्या शेतकऱ्यांना पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे भविष्यात भाजीपाला उत्पादकांसाठी धोक्याची घंटा मिळाली आहे.शासकीय यंत्रणा अपयशीबियाणे, लागवड, खत आणि फवारणीसह भाजीपाला तोडणीचा खर्च मोठा आहे. यानंतरही शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दरात खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांच्या या लुटीला आळा घालण्यात शासकीय यंत्रणा मात्र असमर्थ ठरली आहे.क्लस्टर गेले कुठे?शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवहार घडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून बाजारपेठ उभारण्यात आली. आठ दिवसात ही बाजारपेठ बंद पडली. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि गार्डन रोडवरील नर्सरीतील हे केंद्र आता नावालाच उरले आहे.बाजारात शेतमालाला संरक्षण नाही. व्यापारी वाट्टेल त्या दरात शेतमालाची खरेदी करत आहे. यामुळे वांगे घेऊन येणाऱ्या वाहनाचे भाडेही निघणे अवघड झाले आहे.- प्रमोद शेंदूरकर,तरोडा, ता. दारव्हाव्यापार करताना व्यापारी प्रत्येक खर्च वसूल करतो. मात्र शेतकरी कधी तसा विचार करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. यावर निर्बंध लावण्यासाठी ठोस उपाययोजना असाव्या.- सुनील राठोड, तिवसा

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी