शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

क्विंटलने खरेदी, किलोने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:15 IST

शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान्य ग्राहकसुद्धा लुटला जातो आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव : ग्राहकांना मात्र चौपट दर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान्य ग्राहकसुद्धा लुटला जातो आहे. व्यापाऱ्यांच्या या दरावर एक तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेच नियंत्रण नसावे अथवा वैयक्तिक लाभापोटी बाजार समितीचे कर्तेधर्ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असावे, असे दिसते.यवतमाळच्या बाजारात वांग्याचे ठोक दर ५० ते १०० रूपये कट्टा आहेत. एका कट्ट्यात ३० ते ४० किलो वांगे बसतात. यानुसार शेतकऱ्यांना एक ते सव्वा रूपये किलो वांगे पडत आहेत. बाजारातला हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. अशीच अवस्था कोबीची आहे. कोबीच्या एका कट्ट्यात ६० ते ७० किलोचे नग बसतात. त्याचा दर १५० ते २०० रूपयांपर्यंत आहे. दर आणि असलेले वजन यानुसार कोबीला किलोमागे केवळ २ रूपयांचा दर पडत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोबी आणि वांग्यांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, दर मिळत नसल्याने कोबी आणि वांगे उत्पादक शेतकºयांना फटका बसला आहे.व्यापाऱ्यांच्या नफेखोरीने शेतकरी नाडलावांगे आणि कोबी स्वस्त असली तरी भाजीपाला विक्रेते सर्वसामान्य ग्राहकांना १० ते २० रूपये किलो दरानेच वांगे आणि कोबी विकत आहे. एका किलोवर नऊ पट नफा मिळविला जात आहे. ज्या शेतकºयांमुळे व्यापाºयांना रोजी मिळते, त्या शेतकऱ्यांना पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे भविष्यात भाजीपाला उत्पादकांसाठी धोक्याची घंटा मिळाली आहे.शासकीय यंत्रणा अपयशीबियाणे, लागवड, खत आणि फवारणीसह भाजीपाला तोडणीचा खर्च मोठा आहे. यानंतरही शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दरात खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांच्या या लुटीला आळा घालण्यात शासकीय यंत्रणा मात्र असमर्थ ठरली आहे.क्लस्टर गेले कुठे?शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवहार घडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून बाजारपेठ उभारण्यात आली. आठ दिवसात ही बाजारपेठ बंद पडली. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि गार्डन रोडवरील नर्सरीतील हे केंद्र आता नावालाच उरले आहे.बाजारात शेतमालाला संरक्षण नाही. व्यापारी वाट्टेल त्या दरात शेतमालाची खरेदी करत आहे. यामुळे वांगे घेऊन येणाऱ्या वाहनाचे भाडेही निघणे अवघड झाले आहे.- प्रमोद शेंदूरकर,तरोडा, ता. दारव्हाव्यापार करताना व्यापारी प्रत्येक खर्च वसूल करतो. मात्र शेतकरी कधी तसा विचार करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. यावर निर्बंध लावण्यासाठी ठोस उपाययोजना असाव्या.- सुनील राठोड, तिवसा

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी