शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल हायवेच्या संथगतीने महागाव तालुक्यात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

फोटोसंजय भगत महागाव : नागपूर, औसा, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा असा राष्ट्रीय महामार्ग अर्धापूरजवळ जोडण्यात आला आहे. नागपूरपासून महागावपर्यंत ...

फोटोसंजय भगत

महागाव : नागपूर, औसा, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा असा राष्ट्रीय महामार्ग अर्धापूरजवळ जोडण्यात आला आहे. नागपूरपासून महागावपर्यंत एक कंपनी व महागावपासून नांदेडपर्यंत दुसरी कंपनी चौपदरीकरणाचे काम करीत आहे. कामाच्या संथगतीने तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.

महागाव ते नांदेडच्या कामातील संथगती आणि अनियमितता नागरिकांच्या जिवावर उठलेली आहे. रस्ते अपघात नित्याची बाब झाली आहे. रस्त्यावरील अडथळे आणि नित्याचे अपघात केंद्र सरकारविरुद्ध असंतोषाचे कारण बनले आहे. महागाव ते नागपूरपर्यंत बऱ्यापैकी काम पूर्ण झाले. केवळ हिवरा, लोणबेहळ व अन्य काही ठिकाणी जमीन अधिग्रहण वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. तत्कालीन प्रकल्प संचालक प्रशांत मेंढे यांनी अल्पावधीत आपल्या कार्यकुशलतेमुळे हा रस्ता पूर्णत्त्वाला नेला आहे.

रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे, अपवादवगळता पुलावर नसलेले ट्यूबलेवल, दिशादर्शक फलक, गावाच्या मराठी नावावरून हिंदी नावाचे लागलेले फलक गावाची ओळख बदलून टाकण्यास कारणीभूत ठरले आहेत. नॅशनल हायवेवर होत असलेले अतिक्रमण, रस्त्यावर साचलेले पाणी वाहून जाण्याकरिता पर्यायी जागा नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तत्कालीन प्रकल्प संचालकांच्या बदलीनंतर विद्यमान प्रकल्प संचालकांनी या रस्त्यावरील अर्धवट कामावर अद्याप लक्ष केंद्रित केलेले दिसत नाही. १०० टक्के काम पूर्ण होण्याआधीच भांब राजा येथे टोल नाका सुरू करण्यात आला.

महागाव ते नांदेड हा रस्ता तर अपघाताला निमंत्रण देत आहे. दरम्यान, संबंधित कंपनीच्या मालक भागीदाराचे निधन झाल्यामुळे कामात कमालीची शिथिलता आली आहे. या ९० किलोमीटरमध्ये बहुतांश फुलांचे काम अर्धवट आहे. पर्यायी मजबूत वळण रस्ते नसल्यामुळे वाहतुकीला त्रास होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने अपघात घडत आहेत. मात्र, जखमींना जवळच्या दवाखान्यात नेण्याची सोय किंवा रस्त्यात अपघातग्रस्त झालेले वाहन बाजूला करण्याची सुविधा नाही. अपघातग्रस्त वाहन कित्येक दिवस नॅशनल हायवेवर पडून असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

बॉक्स

चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार

रस्त्याच्या अर्धवट आणि सदोष कामामुळे नागरिक प्रचंड वैतागले आहेत. केंद्र सरकारविरूद्ध संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधी या कामाबद्दल ‘ब्र’ शब्द काढत नाहीत. याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. एकीकडे रस्ते विकासावरून केंद्र सरकारची प्रतिमा उजळ होत असताना लोंबकळत पडलेल्या कामामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.

कोट

मध्यंतरी कंपनी मालकाचे निधन झाल्यामुळे कामात संथगती आली. काही आर्थिक प्रश्न उद्भवले होते. अधिकारी, कर्मचारी कंपनी सोडून गेले. आता काम नियमित सुरू झाले. ७० टक्के काम पूर्ण झाले. तीन महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होईल. वळण रस्ते तत्काळ दुरुस्त केले जातील.

सुनील पाटील, प्रकल्प संचालक नॅशनल हायवे, नांदेड.