शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

बेंबळात ‘अमृत’च्या गटांगळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:32 IST

उन्हाळ्यात यवतमाळकरांना पाणी पाजण्याच्या नादात ३०२ कोटींची ‘अमृत’ योजना फसली. चाचणीतच चार ठिकाणी पाईपच्या ठिकऱ्या उडाल्या. आता नवीन पाईप टाकण्याचेही वांदे सुरू आहे.

ठळक मुद्देजलशुध्दीकरण केंद्राचे काम ३० टक्केच

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळ्यात यवतमाळकरांना पाणी पाजण्याच्या नादात ३०२ कोटींची ‘अमृत’ योजना फसली. चाचणीतच चार ठिकाणी पाईपच्या ठिकऱ्या उडाल्या. आता नवीन पाईप टाकण्याचेही वांदे सुरू आहे. आॅक्टोबर २०१९ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करून यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पाचे पाणी पाजण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापुढे आहे. कामाची सध्याची गती पाहता नियोजित वेळेत पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे.यवतमाळ शहराचा पसारा वाढला. निळोणा आणि चापडोह प्रकल्प भविष्यात शहराची तहान भागवू शकणार नाही. शिवाय बेंबळाचे पाणी आणल्यास नळाला २४ तास पाणी देता येईल, या दृष्टिकोनातून बेंबळाला चालना देण्यात आली. ३०२ कोटी रुपयांची ‘अमृत’ योजना हाती घेण्यात आली. २९ एप्रिल २०१७ रोजी कार्यारंभ झाला. शहरात लहान-मोठ्या पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू झाली. टाक्या उभ्या होत गेल्या. बेंबळापासून २६ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचेही काम सुरू झाले. मात्र २०१८ चा उन्हाळा या योजनेची परीक्षा घेणारा ठरला.बेंबळावरून एक हजार मीमी व्यासाची पाईप लाईन टाकण्याच्या कामाला झपाट्याने सुरूवात करण्यात आली. जॅकवेलवर ५०० ते १५०० हॉर्सपॉवरच्या मोटर लावण्यात आल्या. दिवसरात्र काम करून टाकळी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईप टाकली गेली. या केंद्राच्या टाक्यात पाणी घेण्यासाठी बेंबळा ते टाकळीपर्यंत हायड्रोलीक सिस्टीमने मुंबईतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाईपची चाचणी घेण्यात आली. मात्र पहिल्याच प्रयत्नात भिसनी गावाजवळ जॅकवेलपासून काही अंतरावर पाईपच्या ठिकºया उडाल्या. यानंतर चार ठिकाणी पाईप फुटले अन् पाईप पुरवठ्यातील निकृष्ठतेचा भंडाफोड झाला. त्यासोबतच उन्हाळ्यात यवतमाळकरांना बेंबळाचे पाणी पाजण्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचे स्वप्न भंगले.नवीन पाईप टाकण्याचे फर्मान जीवन प्राधिकरणाच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी सोडले. कंपनीने नवीन पाईप द्यावे, अन्यथा पोलीस कारवाई केली जाईल, असा दम भरला गेला. अखेर कंपनीने ३० कोटींचे पाईप बदलवून देण्याची तयारी दर्शविली. पाईप टाकण्याच्या खर्चाचा भारही कंपनी उचलणार आहे. दोन महिन्यांपूर्वी नवीन पाईप दाखल झाले. टाकळीपासून पाईप टाकणे सुरू झाले. एक ते दीड महिन्यात केवळ ४०० मीटर पाईप टाकण्यात आले. आता मजूर पुरविणाऱ्या कंपनीने हे काम थांबविले आहे. १८ किलोमीटर पाईप टाकायचे आहे. बहुतांश भाग शेतातून गेला आहे. शेतात पिके उभी आहेत. अशावेळी हे काम पुढे सरकरणार नाही, हे निश्चित आहे. शिवाय यापूर्वी झालेल्या कामामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. आता त्यांचा काय पवित्रा राहील, हे पाहणे महत्वाचे ठरते.गतवर्षी लोकप्रतिनिधींनी योजनेचे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांच्या पुढे जाऊन पाणी देण्याच्या घोषणा केल्या होत्या, हे विशेष. आता पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सदर योजनेचे सर्व काम आॅक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे. जुने १८ किलोमीटर पाईप टाकण्यासाठीच पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. आता जुने काढणे, नवीन पाईप बोलावून बसविणे या कामात अधिक वेळ जाणार आहे. सध्याची स्थिती पाहता निर्धारित कालावधीत काम पूर्ण होण्याविषयी साशंकता आहे.निकृष्ट पाईपचा भार ‘मजीप्रा’वरनिकृष्ट पाईप पुरविल्याने प्रकरण पोलिसात नेण्याची तयारी सुरू होती. मात्र नवीन पाईप देण्याचे कंपनीने मान्य केल्याने ही कारवाई थांबविली गेल्याचे सांगितले जाते. कंपनीने नवीन पाईप देऊन टाकण्याची जबाबदारी उचलली. मात्र या कामावर नियंत्रण, प्रत्यक्ष भेटी, लागणारे मनुष्यबळ यासाठी ‘मजीप्रा’वर भार पडणार आहे. याची भरपाई कोण देणार, हा प्रश्न आहे.टाकळी ते वेअर हाऊस यशस्वीटाकळी जलशुध्दीकरण केंद्र ते गोधणी रोडची टाकी, अशी ८०० मीमीची पाईप लाईन टाकण्यात आली. ही सर्व लाईन शहरातून गेली. त्याची हायड्रोलीक चाचणी झाली. टाकळी ते धामणगाव रोडवरील वेअरहाऊसपर्यंत चे पाईप ‘स्ट्राँग’ निघाल्याने प्राधिकरण आणि कंत्राटदाराने सुटकेचा सुस्कारा सोडला. पुढील पाईप लाईनही ‘स्ट्राँग’च निघेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.१८ किमी पाईपलाईननंतर शुद्धीकरण केंद्राची उपयोगिताबेंबळाचे जलशुध्दीकरण केंद्र टाकळी येथे होत आहे. याचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. शहराच्या विविध भागातील नवीन टाक्यांचे काम काही महिन्यात पूर्ण होईल. मात्र १८ किलोमीटर पाईप लाईन पूर्ण झाल्यानंतरच हे केंद्र उपयोगात येणार आहे.यवतमाळकर साशंकजीवन प्राधिकरणाचे अभियंता आॅक्टोबर २०१९ ला योजना पूर्ण होणार असा दावा करीत असले तरी प्राधिकरणाने या योजनेबाबत गेल्या उन्हाळ्यात दिलेल्या विविध तारखा पाहता त्यांच्या दाव्याकडे आतापासूनच साशंकतेने पाहिले जात आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूक