शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

खाण पट्ट्यात शेतीचे झाले तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:00 AM

उकणी व निवली येथील शेतकरी दौलत विठू सातपुते, बाळू रामचंद्र सातपुते, जनार्दन ताजने, भाऊराव ताजने, वासुदेव ताजने, नागोबा खिरटकर, संदीप ताजने, बापुराव ताजने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या शेताच्या काठावरच वेकोलिने उत्खनन केलेल्या मातीचे ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले.

ठळक मुद्देवेकोलिची हेकेखोरी : शेतात साचले कंबरभर पाणी, कपाशी बुडाली

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील खाणपट्यातील शेतकऱ्यांना वेकोलिच्या हेकेखोरीचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी वेकोलिने चुकीच्या पद्धतीने मातीचे डंपींग करून मातीचे ढिगारे उभारल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.निलजई येथील कोळसा खाणीच्या चुकीच्या माती डंपींगमुळे अनेक शेतात पावसाचे पाणी साचले असून शेताला आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतांमध्ये जवळपास कंबरभर पाणी साचले असून कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यामध्ये उकणी व निवली येथील शेतकरी दौलत विठू सातपुते, बाळू रामचंद्र सातपुते, जनार्दन ताजने, भाऊराव ताजने, वासुदेव ताजने, नागोबा खिरटकर, संदीप ताजने, बापुराव ताजने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या शेताच्या काठावरच वेकोलिने उत्खनन केलेल्या मातीचे ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. कपाशीचे पीक पूर्णत: पाण्याखाली आले असून ही पिके आता उद्ध्वस्त झाली आहेत.वणी तालुक्यातील अहेरी, जुनाडा, पिंपळगाव, निलजई, तरोडा, निवली, बोरगाव, कोलगाव, मुंगोली, चिखली टाकळी या भागातही हिच परिस्थिती आहे. वेकोलिने ढिगारे उभे करताना पर्यावरणाचे सारेच नियम पायदळी तुडविले आहेत. ज्या जमिनी वेकोलिने संपादित केल्या नाहीत, त्या शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. शेती केली, तर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पिक घेता येत नाही. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांना छळत आहे.तक्रारी करूनही वेकोलिचे कानावर हातवेकोलिच्या मग्रुरीने खाण पट्टयातील शेतकरी कमालिचे त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी वारंवार तक्रारी करतात. परंतु शेतकऱ्यांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. या हंगामात खाणपट्टयातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. वेकोलिने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उकणीच्या माजी सरपंच संगीता खाडे यांनी केली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती