शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एका कृषी सहायकाकडे १० गावांचा कारभार

By admin | Updated: October 14, 2014 23:25 IST

शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले कृषी सहायक यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. एका कृषी सहायकाकडे १० ते १२ गावे असल्याने कामांचा पार बोजवारा उडाला आहे.

निश्चल गौर - डोंगरखर्डाशेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले कृषी सहायक यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. एका कृषी सहायकाकडे १० ते १२ गावे असल्याने कामांचा पार बोजवारा उडाला आहे. जोडमोहा मंडळात चार तर कळंब मंडळात एक कृषी सहायकाचे पद रिक्त आहे. डोंगरखर्डाला तर अनेक वर्षांपासून स्थायी कृषी सहायक मिळालेले नाही. जोडमोहा मंडळात ५० गावे आणि दोन उजाड गावे अशी ५२ गावे येतात. या मंडळात कृषी सहायकांच्या चार जागा रिक्त आहेत. डोंगरखर्डाला गेली पाच-सहा वर्षांपासून स्थायी स्वरूपात कृषी सहायक लाभले नाही. रिक्त जागा भरल्या गेल्या नसल्याने त्याचा परिणाम शेती नियोजनावर होत आहे. जलपूर्ती, मृदसंधारण, शतकोटी वृक्षलागवड, फळबागा, मग्रारोहयो, सांख्यिकी तक्ते, नैसर्गिक आपत्ती, अनुदान वाटप, विस्तार कार्यक्रम आदी कार्यक्रम आणि उपक्रम कृषी सहायकांकडून राबविले जातात. शिवाय शेती व्यवस्थापन, माती परिक्षण या कामांचीही जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. एवढी सारी जबाबदारी असतानाही ते ‘तत्काळ’मुळे त्रस्त आहेत. कुठल्याही कामांचा अहवाल त्यांच्याकडून तातडीने मागविला जातो. कामाचा वाढता व्याप आणि वरिष्ठांकडून माहितीसाठी लावला जाणारा तगादा या कारणांमुळे ते त्रस्त आहे. एका कृषी सहायकाकडे दहा ते बारा गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोपविलेल्या प्रत्येक गावाला भेट देणे त्यांच्याकडून शक्य होत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, तक्रारी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यांचे समाधान त्यांच्याकडून होत नाही. शासकीय योजनांची माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे योग्य सर्वेक्षण होत नसल्याने तेही योग्य भरपाईला मुकतात. एकूणच कृषी सहायकाअभावी शेतीविषयक प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जोडमोहा मंडळातील चार आणि कळंब मंडळातील कृषी सहायकाचे एक पद तत्काळ भरावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.