शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
3
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
4
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
5
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
6
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
7
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
8
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
9
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
10
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
11
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
12
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
13
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
14
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
15
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
16
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
17
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
18
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
19
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
20
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
Daily Top 2Weekly Top 5

३५२ आरोपींचा पोलिसांना शोधच लागेना !

By admin | Updated: December 2, 2014 23:13 IST

गुन्हा घडल्यापासून पोलिसांच्या हाती न लागलेल्या, न्यायालयात हजर राहून नंतर जामिनावरून पसार झालेल्या जिल्ह्यातील आरोपींची संख्या तब्बल साडेतीनशेंवर पोहोचली आहे.

यवतमाळ : गुन्हा घडल्यापासून पोलिसांच्या हाती न लागलेल्या, न्यायालयात हजर राहून नंतर जामिनावरून पसार झालेल्या जिल्ह्यातील आरोपींची संख्या तब्बल साडेतीनशेंवर पोहोचली आहे. त्यात सर्वात जुना आरोपी हा २२ वर्षांपासून फरार आहे.
पोलिसांकडून दरवर्षी पाहिजे-फरारी आरोपींची यादी अपडेट केली जाते. प्रत्येक पोलीस ठाण्याला त्यांच्या हद्दीतील फरार आरोपींची यादी देऊन शोध घेण्यास सांगितला जातो. परंतु वर्ष संपायला आले तरी पाहिजे-फरारी आरोपींच्या यादीतील आकडा कमी झाला नाही. अर्थात या यादीतील आरोपी अपेक्षेनुसार पोलिसांना सापडले नाहीत. या फरार आरोपींना पकडण्याची जबाबदारी पोलीस ठाण्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेची असते. परंतु गेली अनेक महिने या शाखेत खुर्चीचा खेळ सुरू होता. जुन्या अधिकाऱ्यांना हे आरोपी शोधण्यात अपयश आले. नव्याने रुजू झालेले अधिकारी आता कुठे स्थिरावत आहेत. ३५२ फरारी आरोपींमध्ये ५३ एकट्या यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत.
वडगाव रोड ३४ तर यवतमाळ ग्रामीण ठाणे हद्दीतून २२ फरार आहेत. ३५२ पैकी ८९ आरोपी गुन्हा घडल्यापासून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. वारंवार त्यांचा शोध घेऊनही पोलिसांना यश आले नाही. तर २६३ आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र त्यानंतर ते पुन्हा न्यायालयापुढे हजर झालेच नाही. अशा आरोपींमुळे न्यायालयातील खटले प्रलंबित राहतात. वारंवार वॉरंट निघूनही आरोपीचा थांगपत्ताच नसल्याने त्याची तामिली होत नाही. फरार आरोपींमध्ये कुणी २२ वर्षांपासून, कुणी १५ वर्षांपासून तर कुणी दहा वर्षांपासून आहेत.
यात बहुतांश आरोपी हे भादंवि २७९, ३३७, ४२७, ३०४ (अ) या कलमातील आहेत. अर्थात अपघाताच्या घटनेनंतर परप्रांतीय वाहन चालकांना जामिनावर सोडले जाते. परंतु ते पुन्हा हजर होत नाहीत. अशाच आरोपींची संख्या अधिक असल्याने पोलिसांची पाहिजे-फरारींची यादी फुगली आहे. अनेकदा हे परप्रांतीय ट्रक चालक पोलिसांना आपली नावे खोटी सांगतात. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही बनावट असतो.
पोलीस या आरोपींच्या शोधार्थ गेले तरी त्यांचा ठावठिकाणा सापडत नाही. कारण नाव व पत्ताच चुकीचा असतो. अशा प्रकरणात पोलिसांचा वेळ व पैसा खर्च होतो.
परप्रांतातील आरोपी वगळता अन्य फरार आरोपींची संख्याही बरीच आहे. मात्र त्यांनाही पोलीस शोधू शकलेले नाहीत. त्यात गंभीर गुन्ह्यातील आरोपींचाही समावेश आहे. स्थानिक रहिवासी असलेल्या या आरोपींचा थांगपत्ता पोलिसांना लागत नाही. यावरून पोलिसांचे नेटवर्क कमजोर असल्याचे दिसून येते. काही प्रकरणात चिरीमिरीच्या बळावर अशा आरोपींकडे डोळेझाक होत असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. (स्थानिक प्रतिनिधी)