ठाणे - रुग्णाला मालेगाव येथून मुंबईला घेऊन येत असलेल्या रुग्नवाहिकेला ठाण्यातील आनंदनगरनाका येथे रविवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात रुग्णासह 4 जण जखमी झाले. त्यांना मुंबईतील राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने किंवा सलग गाडी चालवल्याने चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.