Next

उद्धव ठाकरेंपर्यंत सेना आमदार पोहचू शकत नाही? सलग चौथ्या नाराज नेत्याचं उद्धव ठाकरेंना पत्र Sena MLA

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 02:48 PM2022-01-11T14:48:46+5:302022-01-11T14:49:04+5:30

Shivsena MLA Tanaji Sawant wrote letter to Uddhav Thackeray demanded ST Merger in Government सलग चौथ्या शिवसेना नेत्यानं नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलंय. म्हणजे पाहा ना. आधी शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवतेय असं गाऱ्हाणं मांडलं. जिल्ह्यात कुणी ऐकत नाही, भाजप होती म्हणून निवडून आलो अशी खंत सांगोल्याचे सेना आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाबद्दल निर्णय का घेतला जात नाहीये, असं पत्रंच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी लिहिलं. या पत्रातून उद्धव ठाकरेंनाच सवाल विचारण्यात आलेत त्यामुळे संतोष बांगर यांचं हे पत्रं चर्चेत आहे. आता हे कमी होतं म्हणून की काय आणखी एका शिवसेना आमदारानं उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाचं काय झालं, असा थेट सवालच विचारला..