मानखुर्द येथे राहणाऱ्या रोहिणी घोरपडे (२८) या महिलेच्या हत्येचं गूढ तब्ब्ल दोन महिन्यांनी उलगडलं आहे. गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरला घरातून मैत्रिणीच्या लग्नाला जाते सांगून गेलेली रोहिणी घरी पुन्हा परतलीच नाही. त्यानंतर मानखुर्द पोलिसांनी मोठ्या शिताफीने तीन आरोपींना अटक करून काल रायगड जिल्यातील माणगांव येथील शिरसाड गावात पुरलेला रोहिणीच्या मृतदेह बाहेर काढला. मृतदेह माणगांव येथील ग्रामीण रुग्णालयातून जे जे रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.