शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

रोपवाटिकांना बसतोय पाणी टंचाईचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 4:05 PM

वाशिम : बहुतांश सिंचन प्रकल्पांची पाणी पातळी आताच खालावली असून बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बहुतांश सिंचन प्रकल्पांची पाणी पातळी आताच खालावली असून बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्याचा फटका रोपवाटिकांनाही बसत असल्याने आगामी काळात होऊ घातलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांमधून वर्तविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात वनविभागाच्या अखत्यारित २१ आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या १२ रोपवाटिका आहेत. त्यातील रोपांना दैनंदिन लाखो लीटर पाणी लागते. त्यानुषंगाने दोन्ही विभागांनी विहिरी, कुपनलिका, सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ही गरज भागविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील १३१ पैकी ३५ पेक्षा अधिक सिंचन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर असून अन्य प्रकल्पांची पाणीपातळीही कमालीची खालावली आहे. यामुळे धरणांमधून रोपे जगविण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्याचा थेट परिणाम आगामी वृक्ष लागवड मोहिमेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रोपवाटिकांमधील झाडांना लागणारे पाणी उपलब्ध न झाल्याने गतवर्षी अनेक रोपे अक्षरश: जळून गेली होती. तशी परिस्थिती यंदा उद्भवू नये, यासाठी काही रोपवाटिका धरण, तलावस्थळी हलविण्यात आल्या. त्यामुळे सद्यातरी पाण्याची गरज भागत आहे. मात्र, भविष्यात पाणी न मिळाल्यास रोपे जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.- उत्तम फडसहायक वनसंरक्षकसामाजिक वनिकरण विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी