शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

वाशिम जिल्ह्यातील धरणांची स्थिती गंभीर, धरणांमध्ये उरला गाळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 5:30 PM

वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्प वगळता इतर दोन मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांची स्थिती अत्यंत विदारक आहे.

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्प वगळता इतर दोन मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांची स्थिती अत्यंत विदारक आहे. निम्म्याहून अधिक धरणांत मृतसाठाही उरला नसून, जनावरांच्या पिण्यासाठीही पाणी मिळेनासे झाले आहे. केवळ गाळ उरलेले हे प्रकल्प पुन्हा भरण्यासाठी आता पुढील पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा खूप अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचीच गरज आहे. 

वाशिम जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे धरणांत मुबलक जलसाठा झाला नाही. परिणामी हिवाळ्याच्या मध्यातच जिल्ह्यातील निम्म्या धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यात गत १० वर्षानंतर प्रथमच अत्यंत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच उन्हाचा पारा ४३ अशांच्या वर गेल्याने वाशिम जिल्ह्यामधील ३ मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांपैकी निम्म्या प्रकल्पांतील मृतसाठ्याचेही बाष्पीभवन होऊन आता या धरणांत केवळ ओला गाळच उरला आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही अभूतपूर्व भीषण झाली आहे. मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा धरण, मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारे कुरळा धरण, सोनल धरण अशा काही महत्त्वाच्या धरणांसह अनेक लघू प्रकल्पांत गाळच उरला आहे. त्यातच वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील धरण, तर पूर्ण कोरडेच पडले असून, यातील गाळही सुकला आहे. त्यामुळे परिसरातील जनावरांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत.

टॅग्स :Waterपाणी