सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कारंजातील विळेगाव प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 04:29 PM2018-08-12T16:29:17+5:302018-08-12T16:30:41+5:30

कारंजा तालुक्यातील विळेगावला प्रथम १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, तर याच तालुक्यातून बेलमंडळ गावाला ५ लाख रुपयांचा द्वितीय आणि बांबर्डा कानकिरड गावाला ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Vilegaon first in Karanja in Satyamev Jayate Water Cup tournament | सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कारंजातील विळेगाव प्रथम

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कारंजातील विळेगाव प्रथम

Next
ठळक मुद्दे यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्याची निवड झाली होती. विळेगावला प्रथम १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, तर याच तालुक्यातून बेलमंडळ गावाला ५ लाख रुपयांचा द्वितीय आणि बांबर्डा कानकिरड गावाला ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम:  वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे पार पडला. या सोहळ्यात तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून, कारंजा तालुक्यातील विळेगावला प्रथम १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, तर याच तालुक्यातून बेलमंडळ गावाला ५ लाख रुपयांचा द्वितीय आणि बांबर्डा कानकिरड गावाला ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 
पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये महाराष्ट्रातल्या ७५ तालुक्यांमधील ४००० हजार पेक्षा अधिक गावांनी सहभाग घेतला होता. या गावांतील लाखो ग्रामस्थांनी ४५ दिवस जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करून कोट्यवधी लिटर पाणी साठविण्याची क्षमता निर्माण केली. या सर्व वॉटर हिरोजना मानवंदना देण्यासाठी आणि स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी पाणी फाऊंडेशनने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान यांच्यासह कला, राजकारण व उद्योग क्षेत्रातील मातब्बर मंडळी उपस्थित होती. दरम्यान, यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्याची निवड झाली होती. या दोन्ही तालुक्यांतील ५५ गावांनी स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यातील कारंजा तालुक्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया विळेगावला प्रथम १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, तर याच तालुक्यातून बेलमंडळ गावाला ५ लाख रुपयांचा द्वितीय आणि बांबर्डा कानकिरड गावाला ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Web Title: Vilegaon first in Karanja in Satyamev Jayate Water Cup tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.