शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

बैलगाडीसह 2 शेतकरी पाण्यात कोसळले, गावकऱ्यांनी धाव जीव घेऊन वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 15:38 IST

पावसाच्या पाण्यामुळे वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प तुडूंब भरला असून, धरणाच्या बुडीत क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर तीन फूट पाणी आले आहे. शुक्रवारी या पुलावरून शेतात जाताना एका बैलगाडी दोन शेतकऱ्यांसह पाण्यात कोसळली.

वाशिम : पावसाच्या पाण्यामुळे वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प तुडूंब भरला असून, धरणाच्या बुडीत क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर तीन फूट पाणी आले आहे. शुक्रवारी या पुलावरून शेतात जाताना एका बैलगाडी दोन शेतकऱ्यांसह पाण्यात कोसळली. उपस्थितांनी धावाधाव करीत बैल व शेतकऱ्यांना वाचविले. पण, आतातरी जलसिंचन विभाग या घटनेकडे गांर्भीयाने लक्ष देणार का? असा प्रश्न सुरकंडी परिसरातील नागरिकांनी विचारला आहे.

सुरकंडी येथील लांडकदरा शेतशिवारात सन २००७-२००८ मध्ये लघू प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. तब्बल दहा वषार्नंतरही धरणाचे काम पूर्णत्वाकडे आले नाही. यावर्षींच्या दमदार पावसामुळे लघुप्रकल्प तुडूंब भरला असून, या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतशिवारातून मागील बाजुने वाशिमकडून येणारा रस्ता आहे. या रस्त्यावर सुरकंडी गावालगतच्या कमी उंचीच्या पुलावर तीन फूट पाणी आले आहे. त्यामुळे परिसरातील गावांमधील लोकांचा वाशिम शहराशी संपर्क तुटला आहे. सद्यस्थितीत सुरकंडी येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने दिवसभर शेतकरी, महिला व गुरेढोरे याच पुलावरून जिवघेणा प्रवास करीत आहेत. पुलावर जास्त पाणी आल्यामुळे पुलाचे कठडेही पाण्यात बुडाले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरकंडी येथील बळीराम पंढरी जाधव या शेतकऱ्याची बैलगाडी पुलावरून मार्गक्रमण करताना गाडी जास्त पाण्यात गेल्यानंतर बैल बुडाल्यामुळे गाडी सैरवैर होऊन पुलाखाली कोसळून पाण्यात बुडाली. या गाडीसोबत दोन पुरुष व दोन बैलही बुडाले. ही घटना वाऱ्यासारखी गावशिवारात पसरली आणि तीनशे लोकांचा जमाव घटनास्थळी जमला. शेवटी अथक परिश्रमानंतर पुरूष व बैलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये एका बैलाला जबर मार लागला तर बैलगाडीत असलेले युरिया खताचे सात पोते पाण्यात बुडाल्यामुळे जाधव यांचे सात हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेनंतर शनिवारी सकाळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर व तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मुन्नाभाई भवाणीवाले यांच्या पुढाकाराने पुलावरील रस्ता ओळखून येण्यासाठी पुलाच्या दोन्हीकडील कठड्यांना झेंडे लावण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरी