शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे पोट भरणारेच राहताहेत उपाशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST

वाशिम : गोरगरीब आणि गरजू व्यक्तींची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ...

वाशिम : गोरगरीब आणि गरजू व्यक्तींची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. याअंतर्गत जिल्ह्यात शिवभोजन थाळी वितरणाचे २७ केंद्र सुरू आहे. संबंधितांनी शासनाने ठरवून दिल्यानुसार त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकास मोफत जेवण उपलब्ध करून दिले; मात्र प्रशासकीय गलथानपणामुळे तीन ते चार महिन्यांपासून प्रती थाळी ५० रुपयांप्रमाणे मिळणारे लाखो रुपयांचे अनुदान प्रलंबित असल्याने केंद्र चालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात सध्या २७ शिवभोजन थाळी केंद्र कार्यान्वित असून शहरात ही संख्या नऊ आहे. प्रत्येक थाळीमागे सरकारकडून केंद्र संचालकांना ५० रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. त्यानुसार, दिवसाला १५० थाळींचा हिशेब लावल्यास प्रतिदिवसाचे ७५०० रुपये; तर महिन्याकाठी २ लाख २५ हजार रुपये एका केंद्राचे देयक होते. अनुदानाची ही रक्कम दर १५ दिवसांनी अदा करणे बंधनकारक करण्यात आली आहे. असे असताना गत तीन ते चार महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवरून अनुदानाची रक्कमच न मिळाल्याने केंद्रचालक पुरते हैराण झाले आहेत. त्यातील काही केंद्र याच कारणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असून प्रशासकीय गलथानपणाप्रति सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.

...................

सर्वसामान्य केंद्रचालक खर्च कसा भागविणार?

शिवभोजन थाळी केंद्रातून दैनंदिन १५० थाळी पुरविण्याची परवानगी आहे. त्यापोटी मिळणारे अनुदान केंद्र चालकांना गत चार ते पाच महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे भाजीपाला, किराणा साहित्य, गॅस, कामगारांची मजुरी, वीज देयक, दुकानभाड्याची तजवीज करताना केंद्र चालकांच्या नाकीनऊ येत आहे. प्रशासनाकडून पैसेच मिळत नसल्याने हा खर्च कसा भागविणार, असा सवाल केंद्र चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

................

केंद्रचालक होताहेत कर्जबाजारी

शिवभोजन थाळी योजनेमुळे गोरगरिबांची उपासमार टळली आहे; मात्र प्रशासकीय पातळीवरून देयके मिळत नसल्याने त्यांना जेऊ घालण्याकरिता केंद्र चालकांना कर्ज घेऊन खर्च भागवावा लागत आहे. प्रशासनाने दखल घेऊन शिवभोजन थाळी योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रलंबित देयके त्वरित अदा करावी, अशी मागणी होत आहे.

....................

दर १५ दिवसांनी देयक अदा करणे बंधनकारक

शिवभोजन थाळी योजनेंतर्गत कार्यान्वित केंद्रांना दैनंदिन खर्च भागविता यावा, यासाठी दर १५ दिवसांनी त्यांचे देयक अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र पुरवठा विभागाकडून अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात असून तीन ते चार महिन्यांपासून देयक प्रलंबित असल्याने केंद्र चालकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

................

कोट :

जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे देयक यापूर्वी कधीच प्रलंबित राहिले नाही; मात्र गत तीन ते चार महिन्यांपासून बदली प्रक्रिया आणि काही तांत्रिक अडचणींमुळे देयक प्रलंबित राहण्याचा प्रश्न उद्भवला. तो लवकरच निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- सुनील महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

..................

कोट :

२१ जून रोजी अनसिंग येथे मला शिवभोजन थाळी वितरण केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येकास मोफत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे; मात्र त्याचे देय अनुदान मिळालेले नाही. यामुळे दैनंदिन खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला आहे.

- सुनीता सावळे, अनसिंग

...........

शिवभोजन थाळी योजनेंतर्गत दैनंदिन १५० थाळी मोफत जेवण पुरविण्यात येत आहे; मात्र त्याचे देयक प्रशासनाकडे प्रलंबित आहे. ते मिळण्यासंबंधी वारंवार पाठपुरावा करूनही काही फायदा झाला नाही. देयक अदा झाल्यास खर्च भागविणे शक्य होणार आहे.

- गजानन दहात्रे, वाशिम