शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

रिसोडला आणखी १५ दिवस मिळणार पिवळेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 16:15 IST

उन्हाचा पारा वाढल्याने एप्रिल महिन्यात या पाण्याचा रंग पिवळा होतो आणि पुढील आठ ते १५ दिवस पाणी असेच राहणार असल्याचे कळले. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : गेल्या १५ दिवसांपासून रिसोड शहराला अडोळ येथील प्रकल्पातून पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. या पृष्ठभुमीवर लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी या प्रकल्पाला भेट देऊन पाण्याची पाहणी केली आणि माहिती घेतली. उन्हाचा पारा वाढल्याने एप्रिल महिन्यात या पाण्याचा रंग पिवळा होतो आणि पुढील आठ ते १५ दिवस पाणी असेच राहणार असल्याचे कळले. रिसोड शहराला मालेगाव तालुक्यातील अडोळ धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तथापि, गेल्या १५ दिवसांपासून या धरणातून नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी पिवळ्या रंगाचे असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. या दुषित पाण्यामुळे आजाराची भिती असल्याने नागरिक कॅनचे पाणी विकत घेऊ लागले. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन नगराध्यक्षांनी शनिवारी या धरणाची पाहणी केली. त्यावेळी एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यानंतर या धरणातील पाण्याचा रंग पिवळा होत असल्याचे येथे १५ वर्षांपासून काम करणाºया कर्मचाºयाने सांगितले. तथापि, हे पाणी पिण्यास घातक नसून, एप्रिल महिना संपल्यानंतर पुन्हा पाणी निवळणार असल्याने हे पाणी पिण्यास हरकत नाही, असेही त्याने सांगितले.  नगर परिषदेने केले सर्व उपायअडोळ प्रकल्पातून रिसोड शहरात नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी पिवळ्या रंगाचे असल्याने नागरिकांत भिती निर्माण झाली होती. याची दखल नगर परिषद प्रशासनाने घेतली आणि पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पाची साफसफाई केली. त्यात आवश्यक त्या प्रमाणात तुरटीही टाकली. त्यामुळे पाणी निवळून स्वच्छ पाणी पुरवठा होण्याची अपेक्षा होती; परंतु या सर्व उपाय योजनानंतरही नळाद्वारे सोडलेले पाणी पिवळेच असल्याचे आढळून आले. त्यात आता आणखी तुरटी टाकणे अपायकारक आहे. नगराध्यक्षांच्या मते पाणी योग्य वातावरणातील बदलामुळे रिसोड शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ धरणाच्या पाण्याचा रंग पिवळा झाला आहे. तथापि, हे पाणी दुषित नसून, यामुळे आरोग्यास कुठलाही धोका नाही. नागरिकांनी हे पाणी पिण्यास काहीच हरकत नाही, असे मत रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाना आसनकर यांनी धरणाची पाहणी करून माहिती घेतल्यानंतर व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी